महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यांत आम्हीच विजयी होऊ

05:19 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा दावा

Advertisement

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानात मोठ्या बहुमतात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजपसाठी विजयाची कुठल्याही प्रकारची शक्यता नाही. रमण सिंह यांची लोकप्रियता शिगेला असतानाही भाजप 55 किंवा 52 जागांहून अधिक यश मिळवू शकलेला नाही. आता तर ही शक्यता देखील नसल्याचे बघेल यांनी म्हटले आहे. 3 डिसेंबर रोजी निकाल लागेपर्यंत भाजप नेते स्वत:च्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी विजयाचे दावे करत आहे. परंतु निकाल लागल्यावर भाजप 15 हून अधिक जागा जिंकू शकणार नसल्याचे स्पष्ट होईल असे भूपेश बघेल यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत.पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार काँग्रेस बहुमतानजीक पोहोचू शकणार असल्याचे सांगण्यात आले. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा असून बहुमत गाठण्यासाठी 46 जागा जिंकणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article