महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवराई पुलावर पाणी,विद्यार्थी-नागरिकांची गैरसोय

11:18 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

हलशी-देवराई रस्त्यादरम्यान देवराई गावच्या हद्दीत नाला आहे. या नाल्यातून सुलेगाळी, बस्तवाड परिसरातील व आसपासच्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. त्यातच गेले चार दिवस या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने देवराई पुलावर काही वेळ पाणी येते. पाऊस ओसरल्यानंतर पुलावरील पाणी कमी होऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत होतो. या आठवड्यात दोनवेळा या पुलावर पाणी आल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती. देवराई, तारवाड, सुल्लेगाळी, रेडेकोंडी आदी गावातील जनतेला हलशी, नंदगड व खानापूरला जाण्यासाठी या पुलावरून रस्ता आहे. या रस्त्यावरील हा पूल कमी उंचीचा आहे. या भागात मोठा पाऊस झाल्यास या पुलावर पाणी येते. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना व विविध कामांसाठी नंदगड, खानापूरला जाणाऱ्यांना अडचण येते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article