For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवराई पुलावर पाणी,विद्यार्थी-नागरिकांची गैरसोय

11:18 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
देवराई पुलावर पाणी विद्यार्थी नागरिकांची गैरसोय
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

हलशी-देवराई रस्त्यादरम्यान देवराई गावच्या हद्दीत नाला आहे. या नाल्यातून सुलेगाळी, बस्तवाड परिसरातील व आसपासच्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. त्यातच गेले चार दिवस या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने देवराई पुलावर काही वेळ पाणी येते. पाऊस ओसरल्यानंतर पुलावरील पाणी कमी होऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत होतो. या आठवड्यात दोनवेळा या पुलावर पाणी आल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय झाली होती. देवराई, तारवाड, सुल्लेगाळी, रेडेकोंडी आदी गावातील जनतेला हलशी, नंदगड व खानापूरला जाण्यासाठी या पुलावरून रस्ता आहे. या रस्त्यावरील हा पूल कमी उंचीचा आहे. या भागात मोठा पाऊस झाल्यास या पुलावर पाणी येते. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना व विविध कामांसाठी नंदगड, खानापूरला जाणाऱ्यांना अडचण येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.