कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एजीआर संकटावर व्होडाफोन-आयडिया पुन्हा वाटाघाटी करेल

07:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : व्होडाफोन आयडिया समायोजित एकूण महसूल मुद्यांवर पुन्हा सरकारसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे कंपनीचे सीईओ अक्षय मुंडारा यांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारांशी बोलताना सांगितले की ते सरकारसोबत या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आशा आहे की सरकार या प्रकरणात काही दिलासा देऊ शकेल. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने व्हीआयएलची याचिका फेटाळून लावली, ज्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. मुंडारा म्हणाले की, भारताचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल जगात सर्वात कमी आहे. दूरसंचार क्षेत्रातील परतावा इतका कमी आहे की भांडवल देखील देता येत नाही. ते म्हणतात की डेटाच्या किमती इतक्या कमी आहेत की त्या जास्त काळ टिकू शकत नाहीत.

Advertisement

20,000 कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील

Advertisement

व्हीआयएलने अलीकडेच जानेवारी-मार्च 2025 तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्ष 2025 साठीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा तोटा गेल्या वर्षीच्या 7,674.6 कोटी रुपयांवरून 7,166.1 कोटी रुपयांवर आला. संपूर्ण वर्षातील तूट देखील 31,238.4 कोटी रुपयांवरून 27,383.4 कोटी रुपयांवर आली. कंपनीचे उत्पन्न 2.1 टक्के वाढून 43,571.3 कोटी रुपयांवर पोहोचले. कंपनीने 20,000 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या योजनांना मान्यता दिली आहे. हे पैसे सार्वजनिक ऑफर, खासगी प्लेसमेंट आणि इतर पद्धतींद्वारे उभारले जातील, परंतु यासाठी भागधारक आणि नियामक मंजुरीची आवश्यकता असेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article