महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विनेश फोगटकडून पुरस्कार वापसीची घोषणा

06:35 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करणार : बृजभूषण सिंह यांना विरोध सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिग्गज कुस्तीपटूंचा असलेला विरोध कायम आहे. याचदरम्यान विनेश फोगटने स्वत:ला प्राप्त पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. स्वत:ला मिळालेले मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार मी परत करणार असल्याचे विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

विनेशच्या निर्णयावर बोलताना कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपण निशब्द झालो असून असा दिवस कुठल्याही क्रीडापटूच्या वाट्याला येऊ नये असे म्हटले आहे. बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घेषणा यापूर्वीच केली आहे. तर साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असल्याने त्यांच्यापर्यंत हे प्रकरण निश्चितच पोहोचले असेल. मी तुमच्या घरची मुलगी विनेश फोगट असून मागील एक वर्षातील स्थिती व्यक्त करण्यासाठी हे पत्र तुम्हाला लिहित असल्याचे विनेशने नमूद केले आहे.

साक्षी मलिक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर तुमच्या सरकारने तिला बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर केले होते. याची घोषणा झल्यावर देशातील सर्व महिला क्रीडापटू आनंदी झाल्या होत्या. परंतु आज साक्षीला कुस्ती सोडावी लागल्यावर तो क्षण मुला पुन्हापुन्हा आठवत असल्याचे विनेशने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आतापर्यंत काय घडले?

भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्षपदाची  21 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी विजय मिळविला होता. याच्या विरोधात बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. तर साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article