For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : कार्वेत अवकाळी पावसाचा कहर; पिकांचे मोठे नुकसान

03:38 PM Oct 31, 2025 IST | NEETA POTDAR
satara   कार्वेत अवकाळी पावसाचा कहर   पिकांचे मोठे नुकसान
Advertisement

          कार्वे परिसरात शेतकऱ्यांचे पिक भुईसपाट, सोयाबीन आणि भुईमूग पिकांनाही फटका

Advertisement

कार्वे : कार्वे परिसरातील शेतकऱ्यांसाठी गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा फटका दिला आहे. या आघातामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भातशेतीही पूर्णपणे झडून गेली आहे.

यंदा या महिन्यात अनेक वेळा अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. विशेषतः सोयाबीन आणि भुईमूग यांचे पिके कोंब येऊन उत्पादनात घट झाली असून, उरलेले पीक देखील पदरात घेण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या मते, गुरुवारी पहाटे सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे फक्त पिकेच नाही तर शेतीसाठी लागणारी जमीनदेखील पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे उत्पादनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्थानिक शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, कार्वेसह आसपासच्या भागात सुमारे हेक्टरशेभरावर पीकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यंदा पूर्वीच्या पावसाच्या हंगामाच्या तुलनेत यावेळी अनियंत्रित वादळी वारा आणि मुसळधार पाऊस अधिक गंभीर ठरला आहे.

शेती विभाग आणि स्थानिक प्रशासनाला या नुकसानाची माहिती देण्यात आली असून, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीचे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक असून, भविष्यातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचा असा दावा आहे की, सरकारी नुकसानभरपाई योजना लवकर प्रभावीपणे राबवली गेल्यास त्यांच्या आर्थिक संकटात थोडा दिलासा मिळेल.

Advertisement
Tags :

.