सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा
आर. के. पाटील यांचे प्रतिपादन : तालुका म. ए. समितीच्या वतीने बेळगुंदी-सोनोली गावात जनसंपर्क अभियान : कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /किणये
गेल्या 68 वर्षापासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. हा खटला न्यायालयात आहे. सीमाभागातील सीमाबांधव 68 वर्षापासून महाराष्ट्रात जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या लढ्याला नक्कीच यश मिळणार. न्यायदेवता आपल्याला न्याय देणार. मात्र तोपर्यंत आपण रस्त्यावरची लढाई सुरू ठेवली पाहिजे. आणि सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मनोगत एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने तालुक्याच्या गावोगावी जाऊन गाव संपर्क अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी बेळगुंदी-सोनोली भागात हा गाव संपर्क अभियान राबविण्यात आला. यावेळी बेळगुंदी येथे आर. के. पाटील बोलत होते.
सीमाप्रश्नासाठी आपल्या वडीलधारी मंडळींनी तुऊंगवास भोगला आहे. लाठ्या खाल्लेल्या आहेत. काहीजण हुतात्मे झालेले आहेत. त्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्न सुटेपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवला पाहिजे, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले. यावेळी सुनील झंगरूचे, कुम्माना झंगरूचे, अनिल झंगरूचे, शिवाजी कडोलकर, हनुमंत पाटील, भरमु पाटील, संतोष पाटील, हरिभाऊ झंगरूचे, कृष्णा झंगरूचे, माऊती पाटील, बसवंत कडोलकर, भाऊराव कडोलकर, हेमानी हाजगोळकर आदींसह गावातील वडीलधारी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.