महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सनबर्न’ची तिकिटविक्री जोरात

12:00 PM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष : सनबर्न आयोजित न करण्याचा दिलाय आदेश

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न’ कार्यक्रम होणार नाही, असे जाहीरपणे सांगूनही आयोजकांनी या दिवशीच्या कार्यक्रमाची तिकिटविक्री जोरात सुरू ठेवली आहे. त्यामुळे जनमानसात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कळंगुट, वागातोर भागातील व्यवसायिकांनी या प्रकाराला जोरदार विरोध केला आहे. येत्या 31 रोजी रविवार असल्याने त्या दिवशी सनर्बन आयोजित केल्यास  ख्रिस्ती बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होईल, अशी व्यथा कळंगुट व वागातोर येथील ख्रिती बांधवांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मांडली होती. 31 डिसेंबर रोजीचा ‘सनबर्न’ महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

Advertisement

कळंगुटच्या लोकांचा विरोध

त्यानंतर स्थानिकांच्या मागणीचा विचार करुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 31 डिसेंबर रोजी सनबर्न आयोजित करू नये, असा आदेश दिला होता. तरीही या आदेशाकडे दुर्लक्ष करीत आयोजकांनी या दिवशीची तिकीटविक्री जोरात सुरू ठेवली आहे. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी प्रमुख भूमिका बजावत लोकांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली होती. त्यावेळी सनबर्न रद्द करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी दिलाय आदेश

मुख्यमंत्र्यांनी नंतर स्वत: जाहीर केले होते, की येत्या 31 डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत सनबर्न होणार नाही. तरीही आता ही तिकिटविक्री जोरात सुरु आहे. सरकारातील आमदार मायकल लोबो यांनीही लोकांची मागणी उचलून धरीत लोकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सनबर्न कार्यक्रम घेतला जाणार नाही, असे सांगितले होते.

खुलेआम तिकिटविक्री सुरुच

मुख्यमंत्र्यांनी जाहीर करूनही सनबर्नच्या आयोजकांकडून खुलेआम 31 डिसेंबर रोजीची तिकीटविक्री सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी वागातोर व कळंगुट येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article