कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

06:03 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई ते न्यूयॉर्क फेरी : विमानात 322 प्रवासी : साडेआठ तासांच्या उड्डाणानंतर माघारी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

एअर इंडियाचे एक विमान मुंबईहून न्यूयॉर्कला निघाले असताना बॉम्बची धमकी मिळाल्याने ते माघारी बोलावण्यात आले. एअर इंडियाचे बोईंग 350 विमान 303 प्रवासी आणि 19 क्रू मेंबर्ससह उड्डाण करत असताना ही धमकी मिळाली. बॉम्बच्या धमकीसंबंधी माहिती मिळताच ते मुंबई विमानतळावर माघारी बोलविण्यात आले. विमान मुंबईत परतल्यानंतर बॉम्ब शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, तपासात काहीही समोर न आल्याने धमकी खोटी निघाली. सदर विमानाने मुंबईहून सोमवारी पहाटे 2 वाजता उड्डाण केले होते. ते सकाळी 10.25 वाजता पुन्हा विमानतळावर दाखल झाले. विमानात बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याची पुढील उड्डाणासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article