महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंफाळ खोऱ्यातील बंडखोर गटासोबत शांतता करार होणार

06:18 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

मणिपूर हिंसेप्रकरणी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मोठा दावा केला आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत. लवकरच आम्ही एका मोठ्या बंडखोर गटासोबत शांतता करारावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा करत आहोत. मणिपूर हिंसेनंतर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार अनेक मोठी पावले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बंडखोर गटासोबत शांतता करारासंबंधी आमची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरीही त्यांनी कुठल्याही गटाचे नाव घेतलेले नाही. 3 मे रोजी मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसेनंतर राज्य सराकर सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर स्वत:ची बाजू मांडत आहे. परंतु राज्य सरकारने पहिल्यांदाच अशाप्रकारच्या चर्चेची अधिकृत पुष्टी दिली आहे. यापूर्वी राज्य सरकार प्रतिबंधित युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (युएनएलएफ) एका गटासोबत चर्चा करत असल्याचे बोलले जात होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article