कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात ‘वक्फ’ बोर्डाचे एकही प्रकरण नाही

12:26 PM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : गोव्यात वक्फ बोर्डाचे एकही प्रकरण नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे भाजपच्या मेळाव्यात बोलताना दिली. गोव्यात समान नागरी कायदा असल्याने वक्फ बोर्डाचा प्रश्नच उद्भवला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राधा मोहन दास अगरवाल यांनी गोव्यात येऊन भाजप व मगोच्या आमदार-मंत्र्यांना वक्फ बोर्ड दुरूस्ती कायद्याबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोवा सोडल्यास इतर राज्यांनी वक्फ बोर्डाची प्रकरणे आहेत. वक्फ बोर्डाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारला वक्फ बोर्ड दुरूस्ती कायदा करावा लागला. गोव्यातील मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाच्या दुरूस्तीमुळे घाबरून जाण्याचे कोणतेच कारण नाही. कारण, गोव्यात वक्प बोर्डाचे एकही प्रकरण नाही. या ठिकाणी समान नागरी कायदा असल्याने कुणी ही घाबरून जाण्याचे कारण नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article