कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिगडी येथील हिरेमठात चोरी

11:45 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीस किलो चांदीचे दागिने, मूर्ती लांबविली :  घटनेने गावात खळबळ

Advertisement

वार्ताहर/बाळेकुंद्री

Advertisement

बेळगाव व बैलहौगल-सौंदत्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील हिरेमठाचे श्री शिवबसप्पा अज्जनवर मठात (गदगी अज्ज मठ) शनिवारी रात्री चोरट्यांनी 16 लाखाहून अधिक किमतीचे सुमारे तीस किलोहून अधिक चांदीचे दागिने व इतर वस्तू लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिरा शेजारी सुतार बंधूच्या महिला झाडेलोट करत असताना मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत पडल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराला लागूनच आजूबाजूला मठात पूजा करण्याऱ्यांची घरे  तसेच मठासमोर पुंभार वसाहत व  शेतकऱ्यांची घरे असतानादेखील येथे घडलेल्या या चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री पुंभार वसाहातसमोर असलेल्या समोरील मठातील बंद असलेल्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर श्री शिवबसप्पा अज्जनवर मठात मूर्तीवर घातलेला चांदीचा मुखवटा, चांदीचा हार, चांदीची गणेशमूर्ती, चांदीचा नंदीसह अनेक  ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार मठाचे स्वामींनी बैलहौगल पोलीस ठाण्यात दिली आहे.

शनिवारी रात्री या मठात  पूजाविधी आटोपून मंदिरला कुलूप लावून घरी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास मठाची पूजा करायला स्वामी जात असताना मंदिरालगत कुलूप तोडलेल्या अवस्थेत नजरेस पडले, तसेच मठाचा दरवाजाही उघडा असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित गल्लीतील ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर जमलेले ग्रामस्थ  हिरेमठात जाऊन पाहणी केली असता मठातील मूर्तीला घातलेले सर्व चांदीचे दागिने, मूर्ती, इतर साहित्य चोरीला गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी तात्काळ बैलहौगल पोलीस ठाण्याला माहिती दिली.  बैलहोंगलचे  डीवायएसपी रवी नायक सीपीआय पंचाक्षरी सालीमठ व पोलीस तातडीने येऊन पाहणी  करून पंचनामा केला. गावात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही पॅमेऱ्याची फुटेज घेण्यात आली असून लवकरच चोरट्यांना गजाआड करणार असल्याची  बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक यानी तऊण भारतशी बोलताना सांगितले.  या भागात चोरीच्या घटना वाढल्या असून गावात या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article