तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील पथदीप दिवस-रात्र सुरूच
आठ दिवसांपासून सुरू आहे प्रकार
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट येथील रेल्वे उड्डाण पुलावरील पथदीप मागील आठ दिवसांपासून सतत सुरू आहेत. केवळ रात्रीचेच नाही तर दिवसाही पथदीप सुरू राहिल्याने विजेचा अपव्यय होत आहे. या संदर्भात स्थानिकांनी पथदीप व्यवस्थापन विभागाला कळवूनदेखील ते बंद करण्यात आले नाही. शहरातील पथदीप व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. दिवसा पथदीप सुरू तर रात्रीच्यावेळी बंद अशी स्थिती शहर व उपनगरांमध्ये पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पथदीप वेळच्यावेळी सुरू केले जात नसल्याने नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, असे एकीकडे असताना दुसरीकडे तिसरे रेल्वेगेट येथे मागील आठ दिवसांपासून पथदीप सतत सुरू आहेत. उड्डाण पुलावरील पथदीप दिवसा व रात्रीही सुरू राहिल्याने विनाकारण विजेचा वापर सुरू आहेत. त्यामुळे पथदीप विभागाने शहरातील पथदीप वेळच्या वेळी सुरू व बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.