महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

योग्यांनी सदैव सावध राहून निष्काम कर्म करावं

06:30 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, ज्ञानी माणसाला हे माहित असतं की तो कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे आणि समोर दिसणाऱ्या वस्तू कायम टिकणाऱ्या नसल्याने त्यामध्ये गुंतून पडण्यात काही अर्थ नाही. ह्याउलट अज्ञानी मनुष्य आपण कर्ते आहोत ह्यावर ठाम असतो. त्यामुळे तो करत असलेल्या कर्मातून तो फळाची अपेक्षा करतो. अशा अज्ञानी लोकांना सतत कर्म करत रहावे असे वाटत असते. केलेल्या कर्मातून मिळणाऱ्या इष्ट, अनिष्ट फळांचा उपभोग घेण्यासाठी त्यांचा पुनर्जन्म होतो. ज्ञानी मंडळी मात्र स्वत:ला कर्ता समजत नसल्याने ते कोणतीही अपेक्षा न ठेवता वाट्याला आलेले काम समाजाच्या कल्याणाचे उद्दिष्ट ठेऊन करतात.

Advertisement

पुढील विभिन्नत्वमतिं जह्यादज्ञानां कर्मचारिणाम् । योगयुक्त सर्वकर्माण्यर्पयेन्मयि कर्मकृत् ।। 26 ।। ह्या श्लोकात बाप्पा असं सांगतात की, कर्म करणाऱ्या योग्याने इच्छायुक्त कर्म करणाऱ्या अज्ञानी मनुष्यांची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न करू नये. स्वत: मात्र सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करावी. जे लोक मनात काही इच्छा धरून म्हणजे सकाम कर्म करताहेत त्यांना सकाम कर्म करू नका, निरपेक्ष रहा असा उपदेश योगी मंडळींनी करू नये. जरी त्यांना असे वाटत असेल की, त्यांच्याप्रमाणे इतरांनीही निष्काम कर्म करावं आणि त्याप्रमाणे ते सकाम कर्म करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील पण याठिकाणी बाप्पा अशा मंडळींना सावध करताहेत की, बाबांनो असं करण्याच्या फंदात पडू नका कारण तुमच्या समजावून सांगण्याने सकाम कर्म करणारी मंडळी सुधारणार तर नाहीतच उलट ती जे कर्म करताहेत त्याचे फळ सोडायचंय म्हंटल्यावर ते करत असलेल्या कर्माचा त्याग करण्याचीच शक्यता अधिक आहे. अज्ञानी लोकांचा म्हणजे सकाम कर्म करणाऱ्यांचा गैरसमज दूर करण्याच्या नादाला लागू नका असं बाप्पानी सांगितलं पण नुसतं सांगून बाप्पा थांबत नाहीत तर अज्ञानी माणसाचा गैरसमज का दूर होणार नाही हेही समजावून देतात, ते म्हणतात,

अविद्यागुणसाचिव्यात्कुर्वन्कर्माण्यतन्द्रित।

अहंकाराद्भिन्नबुद्धिरहंकर्तेति यो ब्रवीत्  ।।27 ।।

अर्थ- अहंकारामुळे त्याला चांगलं काय वाईट काय हे कळत नसल्याने आपण परमात्म्याहून वेगळे आहोत असे मानून तो स्वत:ला कर्ता समजतो. त्यामुळे तो अविद्या व त्रिगुण यांचा सेवक होतो. त्यामुळे त्याला कर्मयोगाच्या आचरणाचे महत्त्व पटत नाही.

सकाम कर्म करणाऱ्यांना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका असा सल्ला देऊन झाल्यावर बाप्पा योगी मंडळींना आणखी एक मोठ्या धोक्याची सूचना देतात. ती अशी की, जर सकाम कर्म करणारी मंडळी आजूबाजूला असली तर त्यांचं बघून योगी मंडळींना आपणही सकाम कर्म करावं असा मोह होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता योग्याने आपण निरपेक्षतेने कर्म करायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या निश्चयावर ठाम रहायचं आहे. हे व्रत आपणहून स्वीकारलेलं असल्याने त्याला ते व्रत मोडायची इच्छा होत नाही. कधीकधी हे व्रत तापदायी वाटलं तरी मनावर ठेवलेल्या संयमामुळे साधकाला त्याचे ओझे वाटत नाही. असं जरी असलं तरी माणसाची बुद्धी कधी फिरेल हे सांगता येत नाही, ही गोष्ट बाप्पा पुरेपूर जाणून आहेत. म्हणून ते सांगताहेत की, योग्यांनी मात्र सदैव सावध राहून निष्काम कर्म करावं आणि ते मला अर्पण करावं. भक्ताच्या बाबतीतल्या सर्व शक्यता बाप्पा पडताळून पहात आहेत. त्याची अत्यंत काळजी असल्यामुळे ते आईच्या मायेने भक्त जिथे गडबडून जायची शक्यता आहे त्या प्रत्येक बाबतीत सावध करताहेत. भगवंतानी भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात हेच सांगितलंय. ते म्हणतात, नेणत्या कर्म-निष्ठांचा बुद्धि-भेद करू नये । गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनि ती ।।26 ।।

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article