प्री आयएएस सेंटरने घडवले 51 सनदी अधिकारी
कोल्हापूर / रूपाली चव्हाण :
भारतीय नागरी सेवामध्ये राज्यातील विशेषत: कोल्हापुरातील सनदी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी म्हणून कोल्हापुरात 1986 मध्ये कोल्हापूर प्री आयएएस सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरमधून 2023 अखेर 51 सनदी अधिकारी घडवले आहेत. तसेच मागील वर्षी या सेंटरमधून 2 विद्यार्थी आयएएस, तर एक विद्यार्थी भारतीय वन सेवेत रूजू झाले आहेत. कोल्हापूरच्या युवक-युवतींनी कोल्हापूर प्री आयएएस सेंटरचा लाभ घेतल्यास अनेक सनदी अधिकारी तयार होतील.
सेंटरमधून अनेक सनदी अधिकारी बाहेर पडले आहेत. सध्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे 2014 ला या सेंटरमधून आयएएस अधिकारी झाले. आज ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. 1992 मध्ये पहिले आय. ए़ एस. अधिकारी म्हणून भूषण गगराणी तर 1996 मध्ये विश्वास नांगरे-पाटील या सेंटरमधून आय.पी.एस. अधिकारी झाले. गगराणे आता मुंबईचे आयुक्त म्हणून तर नांगरे पाटील आता पोलीस खात्यामध्ये उच्च पदावर आहेत.
भारतीय नागरी सेवामध्ये महाराष्ट्रातील मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी म्हणून, राज्य शासनाने 1976 मध्ये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची मुंबई येथे स्थापना केली. अशा सहा संस्था राज्यात भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. यातील एक सेंटर कोल्हापुरात सुरू झाले.
या संस्थांमध्ये यूपीएससी, सीएसई अर्थात आयएएस, आयपीएस, आयएफएस यासारख्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन केले जाते आहे.
कोल्हापूर येथील प्री-आय.ए.एस. प्रशिक्षण केंद्र (पीआयटीसी) चा उद्देश महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्याना उच्च सार्वजनिक सेवांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी प्रयत्नशील आह़े या सेंटरमधून 80 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात़ त्यांची वर्गवारी उच्च शिक्षण विभागांतर्गत : 60 विद्यार्थी, बार्टी कडून 10, अल्पसंख्यांक आयोगाकडील 10 अशी आहे. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे प्रत्येकी 32 क्षमतेचे वसतीगृह आह़े
वातानुकुलीत वर्गखोल्या, उत्तम वातावरण आणि स्वच्छ जागा, आयएएस उमेदवारांना प्रशिक्षणाचा कर्मचाऱ्याना अनेक वर्षाचा अनुभव आह़े कोल्हापुरातील टॉप आय ए एस कोचिंगच्या यादीत हे केंद्र चौथ्या स्थानावर आह़े ग्रामीण भागातील हुशार आणि नवोदित विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरातील तसेच बाहेरील तज्ञांची व्याख्याने घेतली जातात़ आयएएस, आयपीएस ]िकंवा तत्सम अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात़ युपीएससी पूर्व परीक्षा देणारे ]िवद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात़ त्यांना शासनाने निवडलेल्या दिल्लीस्थित नामांकित संस्थांकडून टेस्ट सेरीज आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत़े या सर्व सोयीबरोबरच विद्याार्थ्यांना प्रति महिना 4 हजार रूपयांइतके विद्यावेतन देण्यात येत़े नाबार्ड, सीएपीएफ, ईएफओ केंद्रस्तरावरील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यशस्वी होत असतात़ आजअखेर कोल्हापूर सेंटरमधून प्रशिक्षित झालेले 50 पेक्षा जास्त अधिकारी प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत़
- सीमाभागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा
- या प्री आय.ए.एस. सेंटरमधून 54 सनदी आधिकारी तयार झाले आहेत़ यांचा फायदा सीमाभागातील विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असून त्यांच्यासाठी खास 5 टक्के जागा राखीव आहेत यांचा सीमाभागातील याक युवतीनी फायदा घ्यावा.
-लता जाधव, संचालक
....प्लॅन बी तयार ठेवा
स्पर्धा परीक्षा अवघड असली तरी यासाठी कोणत्या विभागाकडे जावयाचे, याचा ठाम निर्णय घ्यावा. यासाठी सिलॅबस समजून घेऊनच स्पर्धा परिक्षेकडे वळावे. यासाठी चिकाटी, कष्ट ठेवण्याची गरज आहे. पहिल्या प्रयत्नात कधीच यश मिळू शकते. तर एखाद्यावेळी अपयश आल्यास डगमगून जाऊ नये यासाठी पुन्हा प्रयत्न करा. स्पर्धा परिक्षेसाठी मोठी स्पर्धा आहे. यामध्ये तयारी करून देखील यश न आल्यास पर्याय म्हणून प्लॅन बी तयार ठेवावा. सुजाण नागरीक म्हणून प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे. यातून सर्व विषयाचा सखोल अभ्यास होऊन आत्मविश्वास निर्माण होतो.
-जिल्हाधिकारी अमोल येडगे