महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञाता आत्मानंदात डुंबत असतो

06:18 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

कर्म, अकर्म आणि विकर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत. ईश्वराने नेमून दिलेलं काम म्हणजे कर्म होय. ते निरपेक्षतेनं ईश्वराला स्मरून करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याव्यतिरिक्त आपल्याला हवं तसं फळ मिळावं म्हणून आपल्या डोक्याने आपण जे कर्म करतो ते अकर्म होतं आणि दुष्टबुद्धीने दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने केलेली कामे विकर्म या सदरात मोडतात. अर्थात संपूर्ण निरपेक्ष होणं फार फार अवघड आहे इतकं की, ऋषीमुनींनादेखील ते सहजी साध्य होत नाही. ते करत असलेलं कर्म निरपेक्ष आहे ना याची खात्री वाटत नसल्याने ते त्याची कोणतीही वाच्यता न करता मौनात राहणे पसंत करतात. ईश्वराने नेमून दिलेलं काम त्याला स्मरून निरपेक्षतेनं करत राहणे यातच आपलं हित सामावलेलं आहे. जो असं करत राहतो त्याच्यापाठीमागे भगवंत उभे असतात व अंतिमत: ते त्याला मुक्ती देतात.

Advertisement

निरपेक्षतेने कर्म केले की ते साधकाला जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त करते हे आध्यात्मिक तत्व आहे. जो ह्याप्रमाणे कर्म करत असतो त्याला त्या तत्वाचे दर्शन होते. म्हणजे त्या तत्वाची अनुभूती येते व त्यातील महत्त्व उमगते. अशा मनुष्याला ज्ञाता म्हणतात असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

कर्मांकुरवियोगेन य कर्माण्यारभेन्नर ।

तत्त्वदर्शननिर्दग्धक्रियमाहुर्बुधा बुधम् ।।25।।

अर्थ- फलांनी रहित कर्माचा जो मनुष्य आरंभ करतो त्याचे कर्म, तत्वदर्शनाचे योगाने दग्ध होते. अशा, मनुष्याला ज्ञाता असे म्हणतात.

विवरण- कर्मसंन्यासाचे आचरण करणे म्हणजे ईश्वराने नेमून दिलेलं कार्य तो आपल्याकडून करून घेत आहे असा विचार मनात दृढ करून कार्य करणे. त्यासाठी मी कर्ता नाही हा विचार मनात पक्का रुजवायला हवा. कर्मसंन्यास घेण्यापूर्वी मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो. त्यानुसार फळाच्या अपेक्षेने तो कर्मे करत असतो पण आता आपण कर्ते नाही ह्या विचाराने आपण करतोय ते ईश्वराचं कार्य आहे, आपण फक्त माध्यम आहोत हे लक्षात घेऊन मनुष्य फळाची अपेक्षा न करता कार्य करतो. त्यामुळे त्याला केलेल्या कर्मातून पाप पुण्याचं बंधन लागू होत नाही. निरपेक्षतेने कर्म करण्याचे तत्व त्याने पूर्णत: अंगी बाणले की त्याच्या मूळ स्वभावात बदल होऊन तो संपूर्ण निरपेक्ष बनतो. कर्मयोगाच्या आचरणामुळे त्याच्या अंत:करणात आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. त्या ज्ञानाग्नीत त्याचं पाप पुण्य जळून गेलेलं असतं. हे तत्वदर्शन ज्याला झालंय तोआत्मज्ञानी आहे हे लक्षात घेऊन त्याच्याआधी आत्मज्ञान झालेली ज्ञाते मंडळी त्याचा ज्ञाता म्हणून गौरव करतात. असा ज्ञाता मनुष्य सदैव आत्मानंदात तृप्त होऊन डुंबत असतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत.

फलतृष्णां विहाय स्यात्सदा तृप्तो विसाधन: ।

उद्युक्तो पि क्रियां कर्तुं किंचिन्नैव करोति स ।। 26।।

अर्थ- जो फलेच्छा सोडून सर्वदा तृप्त असतो व साधनरहित असतो, तो कर्म करण्यास उद्युक्त होऊन कर्म करीत असला तरी काही करीत नाही.

विवरण- निरपेक्षतेनं कर्म करण्याचं तत्वदर्शन ज्यानं जाणलंय त्याच्या मनात केलेल्या कर्माच्या फळाची तर अपेक्षा नसते, इतकंच काय त्याच्या मनात त्या फळाचे विचारसुद्धा येत नाहीत. मनात फळाचे विचार जरी आले तरी एकाग्रता भंग पावते पण निरपेक्षतेचे तत्वदर्शन ज्याला झालंय तो केवळ कर्म करत असतो आणि त्याचवेळी निर्विचार अवस्थेत आत्मानंदात डुंबत असतो. प्रत्यक्षात तो जरी ईश्वराने दिलेलं कर्म करत असला तरी त्याचा त्या कर्माकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन मी करत असलेलं कार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि ते माझ्याकडून ते पूर्ण करून घेत आहेत इतकंच, असा असतो.

क्रमश:

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article