महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसाचा जोर कमी,‘रेड अलर्ट’ मागे

12:08 PM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : पावसाचा जोर आता कमी झाला असून हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’चा इशारा मागे घेतला आहे. गेल्या 24 तासात दक्षिण गोव्याला पावसाने झोडपून काढले. उत्तर गोव्यात मात्र पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात खाली उतरले. राज्यात पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून जाईल, असे हवामान खात्याने कळविले आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज आहे. 18 जूनपर्यंत राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान खात्याने कळविले आहे. गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मुरगाव येथे अडीच इंच झालेली आहे. मडगावात दोन इंच, काणकोणमध्ये पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी व पेडणे येथे प्रत्येकी एक इंच, तर म्हापसा येथे पाऊण इंच पाऊस झाला. केपे व सांगे येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झालेली आहे. सांखळी व वाळपई येथे अर्धा इंचापेक्षा कमी पावसाचे नोंद झालेली आहे.

Advertisement

एकूण पाऊस 13 इंच

Advertisement

राज्यात गेले काही दिवस पडत असलेला एकूण पाऊस आता 13 इंच झाला आहे. एव्हाना सरासरी दहा इंच पाऊस होत असायचा. गेल्या 24 तासात राज्यात सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली असून यातील अर्धा इंच उत्तर गोव्यात तर दक्षिण गोव्यात सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. आजपासून राज्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article