महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संविधान समस्त भारतीयांचे मार्गदर्शक!

12:38 PM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

गोवा विद्यापीठ मैदानावर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Advertisement

पणजी : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  देशाला भारतीय संविधानाच्या ऊपात दिलेला दस्तावेज हा केवळ कायद्याशी संबंधित दस्तावेज नाही. ‘आम्हा भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे जतन करणारी घटना म्हणजे देशाची आदर्शवादी राज्यघटना आहे’, असे डॉ. आंबेडकर यांनी देशवासीयांना संविधान सुपूर्द करताना सांगितले होते. देशातील जनतेला संविधानाशिवाय पर्याय नसून, देशवासीयांना मार्गदर्शक म्हणून संविधानाचे फार मोठे महत्त्व आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.

Advertisement

गोवा विद्यापीठाच्या मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई मार्गदर्शन करीत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम, पोलिस महासंचालक आलोक कुमार तसेच इतर सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

गोवा सरकारने भारत सरकारच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियान सुरू करून राज्याचा विकास करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणेवर भर दिला आहे. गोव्यात रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, विमानतळ यांच्या विकासाचे जाळे विणल्यामुळे त्याचा राज्याबरोबरच देशवासीयांना लाभ होत आहे. गोवा हे देशातील वेगाने प्रगती करणारे राज्य म्हणून ओळखले जात असून, पहिल्या तीन राज्यात देशात गोवा हे तिसऱ्या क्रमांकावरचे राज्य आहे, असे राज्यपाल पिल्लई म्हणाले.

राजभवनमार्फत अन्नदान योजना

गोव्याच्या राजभवनमार्फत 50 गरीब व गरजू लोकांना दररोज अन्नदान करण्याची योजना सुरू केलेली आहे. यापुढे अन्नाबरोबरच गरजू लोकांना कपडेही पुरविण्यात येणार आहेत. गोव्यातील लोकांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच प्रगती व समृद्धी यासाठीही योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल पिल्लई यांनी केले.

अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री पुरस्कार’

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि प्रधान मुख्य वनपाल प्रवीण कुमार राघव यांना ‘मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia