महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यासाठीच केला होता अट्टाहास?

11:24 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रामलिंगखिंड गल्लीत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग, स्थानिक रहिवासी मेटाकुटीला

Advertisement

बेळगाव : जत्तीमठापासून हेमू कलानी चौकापर्यंतचा रामलिंगखिंड गल्लीच्या रस्त्याचे प्रशासनाने अट्टाहासाने रुंदीकरण केले. वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण झाले खरे. परंतु, प्रत्यक्षात केवळ पार्किंगसाठीच रस्त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे यासाठीच केला होता का अट्टाहास? असा प्रतिप्रश्न गल्लीतील नागरिकांकडून विचारला जात आहे. 2015 मध्ये महानगरपालिकेकडून रामलिंगखिंड गल्लीचे रुंदीकरण करण्यात आले. नागरिकांचा विरोध असतानाही तब्बल 60 फूट रुंदीकरण करण्यात आले. यामुळे गल्लीतील अनेकांची घरे पाडण्यात आली. तर अनेक जण बेघर झाले. शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गल्लीतील नागरिकांनीही प्रतिसाद देत रुंदीकरणाची प्रक्रिया पार पाडली. परंतु, प्रत्यक्षात या रस्त्याचा वापर केवळ पार्किंगसाठीच केला जात आहे. कपिल टॉकीजपासून हेमू कलानी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात येत आहे. काहीवेळा तर एकाचवेळी दोन-दोन वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करण्यासही जागा उपलब्ध नसते. स्थानिक नागरिकांनी रस्त्यासाठी आपल्या जागा दिल्या. परंतु, आता त्यांच्याच घरासमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने त्यांनाही येणे-जाणे कठीण झाले आहे.

Advertisement

बेशिस्त पार्किंग...

रामलिंगखिंड गल्लीत बेशिस्त पद्धतीने वाहनांचे पार्किंग केले जात आहे. याचा फटका तेथील व्यापाऱ्यांनाही बसत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांनी यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. परिसरात पे अॅण्ड पार्किंगची व्यवस्था असतानाही कोणत्याही घरासमोर विचारणा न करता वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने पोलिसांनीच कणखर भूमिका घेणे गरजेचे झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article