कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तो मी नव्हेच!

05:59 PM Jun 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दिसला बिबट्या... चर्चा मात्र वाघाची !

Advertisement

 कराड / सुभाष देशमुखे :

Advertisement

वाघ दिसला... वाघ दिसला..." या चर्चांनी कराडलगत आगाशिवनगर परिसरात अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्या  मानवी वस्तीजवळ दिसल्याच्या घटना घडत असताना आता वाघ आल्याच्या चर्चा सुरू झाल्याने परिसरात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या चर्चा  फोल असून तो वाघ नव्हे... तर बिंबट्या आहे' असा ठोस निष्कर्ष वन्यजीव तज्ज्ञांनी काढला आहे.

कराडलगत मलकापूर, आगाशिवनगर, जखिणवाडी, विंग, चचगाव यासह अनेक गावांत आगाशिव डोंगर विस्तारला आहे. डोंगर पायथ्याला  मानवी वस्तीत  बरेधा वियत्गा दिसला आहे. वियत्गाच्या हल्ल्यात शेकडा पाळीव प्राण्यांचा बळी गेल्याचे वारंवार उघड झाले आहे. नुकताच आगाशिवनगर येथील गणेश कॉलनीत सलग दोन दिवस वियत्या दिसल्याने भीती निर्माण झाली. स्थानिक नागरिकांच्या मोबाईलमध्ये बिबट्याची हालचाल टिपली गेली. ही भीती कायम असतानाच त्याच परिसरात वाघ दिसल्याची चर्चा सुरु झाली. पण तो वाघच होता का? यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.

कराडशेजारीच आगाशिव डोंगरमाथ्याच्या रांगांमध्ये चिवट्याचा वावर आहे. हे क्षेत्र बाधाच्या नैसर्गिक अधिवासात मोडत नाही, बाध आणि विवधा यांचे आकार, हालचाल, पाऊलखुणा आणि आवाव यात स्पष्ट फरक असती. मात्र रात्रीच्या वेळेस किंवा दूरवरून झटक्यात विसलेल्या एखाद्या वियत्यालाही सामान्य नागरिक वाघ समजू शकतात, असा बन विभागाचा अनुभव सांगतो. दरम्यान, कराड तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये आतापर्यंत एकदाही बाघ दिराल्याची नोंद नाही.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागाने काही महत्त्वाच्या ठिकाणी 'ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. या कॅमेन्यात आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पात दोन वेळा वाघाची छबी आढळली होती. नुकत्याच झालेल्या कोयनेतील प्राणीगणनेत बाधाची डरकाळी ऐकू आली होती. मात्र वियत्याचे अभयारण्यात आणि कराड व पाटण तालुक्यात अनेकवेळा चित्रीकरण झाले आहे. नुकत्याच पावसाच्या आगमनामुळे डोंगराळ भागात हिरवळ चाढली आहे. यामुळे तहान-मोठे प्राणी, शिकारीसाठी बिबट्या किंवा माकड, ससे पांवी हालचाल मानवी बरतीकडे सरकरी वाघाचे वास्तव्य  सहसा खोल जंगलात, विस्तीर्ण मागारा असरी बाघ फार क्वचितच मानवी वस्तीकडे येतो आणि आरा तरी तो नेहमीच आपल्या अस्तित्वाचे लक्षण स्पष्टपणे ठेवतो. मोठ्या पाऊलखुणा, खवले काकलेले झाड, मृत शिकार उसे अनेक पुरावे मिळतात. सध्या आगाशिव परिसरात असे कोणतेही ठोस संकेत सापडलेले नाहीत.

वनक्षेत्रपाल ललिता पाटील, आनंद जगताप यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेश कॉलनी परिसरात जिथे  बिबट्या दिसला, त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एखादा प्राणी या परिसरात आल्यास त्याची नीष स्पष्ट होणार आहे. वास्तविक नागरिकांना दिसलेला ताप नाहीच, हा निष्कर्ष गनविभागाने काकला आहे. मात्र तरीही ट्रॅप कॅमेरे लावते आहेत. बिबट्याचा मानदी वस्तीतील बाबर हा सुद्धा घोकावायक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वनविगागाने गस्ताही वाढवली आहे.

लोक जेव्हा 'बाध दिसला असे सांगतात, तेव्हा त्यामागे भीती असते, पण ती नेहमी बरतुरिथती नसते अरो तज्ज्ञ सांगतात. लोकसहभाग आणि वनविभागातील समन्वयातून अशा वद्यचि समाधानकारक निराकरण करता येते. चाच दिसल्याव्या बातम्यांनी भीती पसरवू नये, तर अभ्यासपूर्वक व वस्तुनिष्ठ माहितीबर आचारित कृती करणे हाच योग्य मार्ग असल्याचे मत मानव वन्यजीव संरक्षक रोहन गाटे यांनी सांगितले.

वनविभागाच्या वतीने गणेश कॉलनीसह परिसरात पाहणी करण्यात आली

वनक्षेत्रपाल ललिता पाटील, यनपरिमंडळ आनंव जगताप, कैलास सानप, अक्षय पाटील, भारत पवार यांनी नागरिकांशी चर्चा केली

नागरिकांना भीतीने गोंधळून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे

लहान मुलांना एकटं सोडू नये, संध्याकाळनंतर डोंगराकडे जाणं टाळावं, धराबाहेर प्रकाशाची व्यवस्था ठेवावी

एखावी घटना घडल्यास त्वरित वन विभागास कळवावे

 

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article