कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रपती, राज्यपालांवर कालबंधन अवैध

07:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रपतींच्या प्रश्नावलीवर सर्वोच्च न्यायालयाचे मत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

राज्य सरकारांनी विधानसभांमध्ये संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विशिष्ट कालावधीत स्वाक्षरी करावी, असे बंधन घालणे घटनाबाह्या आहे, असे महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे या संदर्भात 14 प्रश्नांची ‘संदर्भ प्रश्नावली’ पाठवून यासंबंधी मत मागितले होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वातील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने या प्रश्नावलीवर एकमुखी निर्णय देताना राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत.

सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. सूर्य कांत, न्या, विक्रम नाथ, न्या. एम. एस. नरसिम्हा आणि न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सप्टेंबरमध्ये 10 दिवस सलग सुनावणी झाली. त्यानंतर घटनापीठाने निर्णय सुरक्षित ठेवला होता. सरन्यायाधीश भूषण गवई येत्या रविवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीआधी त्यांच्या नेतृत्वातील घटनापीठाने हे दूरगामी परिणाम साधणारे ‘विमर्शमत’ (अॅडव्हायझरी ओपिनियन) राष्ट्रपतींच्या प्रश्नावलीवर दिले आहे.

प्रकरण काय आहे...

तामिळनाडूच्या विधानसभेने 10 विधेयके संमत केली होती. ती नियमाप्रमाणे राज्यपालांकडे संमतीच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आली होती. तथापि, राज्यपालांनी अनेक दिवस या विधेयकांवर स्वाक्षरी केली नाही. नंतर त्यांनी ती राष्ट्रपतींकडे अधिक विचारासाठी पाठविली. राष्ट्रपतींनीही त्यांच्यावर बराच काळ स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे तामिळनाडू सरकारने घटनेतील ‘रिट ऑफ मँडॅमस’ अंतर्गत याचिका सादर केली होती. विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कालावधीचे बंधन घालण्यात यावे. तसेच निर्धारित कालावधीत त्यांनी संमती दिली नाही, तर विधेयके संमत झाली आहेत, असे मानण्याचा अधिकार राज्य सरकारांना असावा, अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. ए. एस ओक यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने याचिका मान्य करुन राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर विधेयकांवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी कालावधीचे बंधन घोषित केले. तसेच, या कालावधीत स्वाक्षरी न केल्यास विधेयके संमत झाली आहेत, असे गृहित धरले जाईल, असाही निर्णय दिला होता. हा निर्णय राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या घटनान्मक अधिकारांना मर्यादित करणारा आहे, या कारणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे 14 मुद्द्यांची संदर्भ प्रश्नावली पाठविली होती. या प्रश्नावलीवर दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आले होते. घटनापीठाने निर्णय त्यानंतर सुरक्षित ठेवला होता.

काय म्हणते सर्वोच्च न्यायालय...

दूरगामी परिणाम करणारा निर्णय

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article