महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढविल्या

06:29 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या किमती 1 एप्रिलपासून होणार लागू : कंपनीचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती गुरुवारी 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून वाहनांच्या विविध मॉडेल्स आणि प्रकारांनुसार नव्या किमती लागू होणार आहेत.

खर्चात वाढ झाल्यामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जानेवारीत व्यावसायिक वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढल्या

यापूर्वी टाटा मोटर्सने 1 जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. कंपनीने 1 फेब्रुवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती 0.7 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. तेव्हाही कंपनीने सांगितले होते की, किमती वाढवण्याचा उद्देश उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची भरपाई करणे हे असल्याचे स्पष्ट केले आहे.

टाटा मोटर्सचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढून 1,038 वर पोहोचले. व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ झाल्याच्या बातम्यांदरम्यान, टाटा मोटर्सचे समभाग हे  गुरुवारी 20.35 रुपये किंवा 2.00टक्क्यांच्या वाढीसह 1,038 रुपयावर बंद झाले. यासह कंपनीचे बाजारमूल्य 3.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टाटा मोटर्स व्यावसायिक आणि प्रवासी वाहन व्यवसाय वेगळे करणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी 4 मार्च रोजी, टाटा मोटर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने  कंपनीच्या व्यवसाय ऑपरेशन्सची दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विभागणी करण्यास मान्यता दिली होती, म्हणजे डिमर्जर. कंपनीला तिची व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने व्यवसाय वेगळे करायचे आहेत.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजच्या सूचनेमध्ये म्हटले होते की, दोन्ही व्यवसायांना बळकटी देण्यासाठी आणि उच्च वाढ साध्य करण्यासाठी डिमर्जर केले जात आहे. डिमर्जर दोन्ही व्यवसायांना त्यांच्या संबंधित धोरणांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करेल.

डिमर्जरचा कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. कंपनीला वाटते की ती विशेषत: ईव्हीएस, स्वायत्त वाहने आणि वाहन सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये समन्वय वापरू शकते. टाटा मोटर्सला आशा आहे की या डिमर्जरमुळे आमचे कर्मचारी, ग्राहक आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article