महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त करा

11:49 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कडोली नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

Advertisement

बेळगाव : एका मतिमंद तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वारंवार अशा घटना घडत असून संबंधित तरुणावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन कडोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिले. त्या तरुणाकडून हे कृत्य घडले असून अशा घटना वारंवार घडत आहेत. अशामुळे गावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळा-महाविद्यालयाला ये-जा करणाऱ्या तरुणींची छेड काढली जात आहे. याबाबत अनेकवेळा तरुणांना समज देण्यात आली असली तरी त्यांच्या वागण्यात फरक झालेला नाही. यामुळे गावात अशांतता निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीकडून अनेक वेळा समज देण्यात आली असली तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली. यावेळी ग्राम पं. सदस्य, अध्यक्ष यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article