भेंडी बाजार परिसरातील गटारी साफ करण्यास प्रारंभ
10:34 AM May 25, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : भेंडी बाजार परिसरातील गटारींमध्ये कचरा साचून होता. तो कचरा काढावा, अशी या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेंडीबाजार परिसरातील गटारी साफ केल्या आहेत. गटारीच्या बाजुला ठेवलेल्या कचऱ्याची तातडीने उचल करावी, अशी मागणी होत आहे. बाजारपेठेमधील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करणे महत्त्वाचे आहे. भेंडीबाजार परिसरातील जशा गटारी साफ करण्यात येत आहेत. तशाच प्रकारे मुख्य बाजारपेठेतील गटारीही साफ कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी या गटारी साफ करणे नितांत गरजचे आहे. कारण गटारीमध्ये प्लास्टिक कचरा साचून आहे. पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. तेंव्हा महानगरपालिकेने सर्वच गटारी साफ करणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article