महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या टप्प्यातील विशेष मतदारसंघ

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रकट प्रचार गुरुवारी संपला आहे. उद्या शनिवारी मतदान होणार आहे. या टप्प्यातील काही मतदारसंघ विशेष लक्ष ठेवावे असे आहेत. केवळ प्रभावी उमेदवारांच्या दृष्टीकोनातूनच नव्हे, तर या मतदारसंघांची काही इतर वैशिष्ट्योही आहेत. काही मतदारसंघांसंबंधी अशा समजुती आहेत, की तेथे जो पक्ष किंवा आघाडी विजयी होते, तोच पक्ष किंवा तीच आघाडी देशातही सरकार स्थापन करते. तसेच काही मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्याही वैशिष्ट्यापूर्ण आहेत. त्यांचा हा आढावा...

Advertisement

दिल्ली

Advertisement

उत्तर प्रदेश

बिहार

हा मतदारसंघ परिसीमनानंतर 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघातील ही चौथी निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाने आपले तीन वेळचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. महागठबंधनच्या युतीत ही जागा काँग्रेसला मिळाल्याने काँग्रेसने मदन मोहन तिवारी यांना तिकिट दिले आहे. तथापि, जयस्वाल यांचे पारडे जड असल्याचे तज्ञांचे मत आहे.

हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सलग तीन वेळा जयस्वाल हेच निवडून आले आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्क्य वाढत गेलेले दिसते. 2009 मध्ये 47 हजार, 2014 मध्ये 1 लाख 10 हजार आणि 2019 मध्ये 2 लाख 93 हजार असे त्यांचे मताधिक्क्य आहे. यंदा ते सलग चौथ्यांदा खासदार होण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने यश शक्य आहे.

या मतदारसंघात साधारणत: 18 लाख मतदार असून अन्य मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजांची मते निर्णायक ठरतात. ब्राम्हण आणि सवर्ण मतेही त्याखालोखाल आहेत. या मतदारसंघाच्या काही भागांमध्ये मुस्लीमांचा प्रभाव दिसून येतो. तथापि, राजकीय तज्ञांच्या मतानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव येथे निर्णायक ठरणार, असे दिसून येत आहे.

झारखंड

हरियाणा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. 1996 पासूनच्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये येथे पाच वेळा भारतीय जनता पक्ष तर दोन वेळा काँग्रेसला यश मिळाले आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला होता. यावेळी या पक्षाने उमेदवारामध्ये परिवर्तन केलेले आहे.

खट्टर यांच्या विरोधात काँग्रेसने दिव्यांशू बुद्धीराजा यांना उतरविले आहे. तर जननायक जनता पक्षाने देवेंद्र काडियान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लढत तिरंगी आहे. या मतदारसंघात अन्य मागासवर्गीयांचे प्राबल्य असून त्याखालोखाल जाट मतदार असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाने या राज्यात सर्व 10 जागांवर विजय मिळविला होता. यंदा तो टिकविण्याचे आव्हान आहे.

या मतदारसंघात साधारणत: 22 लाख मतदार आहेत. मागची निवडणूक भारतीय जनता पक्षाचे संजय भाटिया यांनी 70 टक्के मते आणि 6 लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने जिंकली होती. तरीही यावेळी या पक्षाने येथे उमेदवार नवा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ या पक्षासाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला असावा, असे मत तज्ञ व्यक्त करतात.

ईशान्य दिल्ली मतदारसंघ

जौनपूर मतदारसंघ

गोपालगंज मतदारसंघ

भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांच्यात युती झाल्याने हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षासाठी सोडला आहे. संयुक्त जनता दलाने येथे अलोक कुमार यांना उमेदवारी दिली असून महागठबंधनकडून ही जागा व्हीआयपी या नव्या पक्षासाठी सोडण्यात आली आहे. या पक्षाने येथे प्रेमनाथ चंचल यांना उमेदवारी दिली असून निवडणूक चुरशीची होणे शक्य आहे.

2014 मध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जनकराम हे उमेदवार जवळपास पावणेतीन लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तथापि, युतीच्या जागावाटपात ही जागा संयुक्त जनता दलासाठी सोडण्यात आली. 2019 मध्ये येथून अलोककुमार हेच निवडून आले होते. यंदा संयुक्त जनता दलाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ कुमार यांच्यासाठी सोपा दिसून येतो.

हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. स्वाभाविकच येथे या समाजांची संख्या मोठी आहे. अलोक कुमार यांच्या प्रमाणेच प्रेमनाथ चंचल यांचाही जनसंपर्क मोठा असल्याने आणि त्यांना महागठबंधनचे पाठबळ असल्याने ते जोरदार लढत देण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात मतदार संख्या साधारणत: 17 लाख इतकी असून अन्य मागासवर्गीयांचे प्रमाणही मोठे आहे.

जमशेदपूर मतदारसंघ

गुरगाव मतदारसंघ

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article