कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोयाबीन महागले, पदरी निराशाच !

03:30 PM Aug 31, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कडेगांव / हिराजी देशमुख :

Advertisement

राज्यात खरीप हंगामापूर्वीच झालेल्या पावसामुळे पेरण्या रखडल्याने सोयाबीनचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होऊन दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. कारण, यंदा उत्पादन कमी आहे आणि गेल्या वर्षीचा साठा बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरात विकून टाकला आहे. त्यामुळे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागणार नसल्याचे चित्र आहे.

Advertisement

यंदा राज्यात मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीनची पेरणीच होऊ शकली नाही. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने, गेल्या महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली आहे. गेल्या वर्षी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरलेले दर, आता साडेचार ते पाच हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, या दरवाढीचा आनंद साजरा करण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाहीत. कारण, गेल्या वर्षी दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनची विक्री न करता घरातच साठवून ठेवले होते. वर्षभर वाट पाहूनही दर न वाढल्याने आणि साठवलेल्या सोयाबीनला कीड लागण्यास सुरुवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात आपला माल विकून टाकला.

आता बाजारात तेजी आली आहे, तेव्हा शेतकऱ्यांकडे विकायला सोयाबीनच शिल्लक नाही. सध्या बाजारात दर वाढत असले तरी, हाती उत्पादन नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाऐवजी चिंतेचे वातावरण आहे. जेव्हा माल होता, तेव्हा भाव नव्हता आणि आता भाव आहे, तर माल नाही, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. सध्या वाढलेले दर पुढे टिकतील का, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे

सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ५,००० रुपयांपर्यंत वाढले. गेल्या वर्षी कमी दरामुळे शेतकऱ्यांनी माल आधीच विकून टाकला. सोयाबीनचे दर वाढूनही हाती उत्पादन  नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सोयाबीनचे दर वाढत असतानाच या दरवाढीला काही अंशी ब्रेक लागला आहे याचे कारण म्हणजे कर्नाटक व अन्य राज्यांमधून सोयाबीनचा काढणी हंगाम सुरू झाला असून नवीन सोयाबीन बाजारपेठेत आल्याने हे दर कमी अधिक होत असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. तरीही यावर्षी मात्र सोयाबीनचे दर हे खरीप हंगामात सोयाबीन उत्पादन नसल्याने वाढलेलेच राहतील, अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article