महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलतर्फे कारगिल विजयोत्सवाचा रौप्यमहोत्सव साजरा

10:34 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : देश आणि देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी भारतीय जवानांनी नेहमीच उत्तम कामगिरी बजावली आहे. शौर्य आणि उत्स्फूर्तता यांचे दर्शन घडवत भारतीय जवानांनी कारगिलवर विजय मिळविला. देशरक्षणासाठी ज्यांनी प्राणांची बाजी लावली, अशा सर्व शहीद सैनिकांप्रती आपण कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे, असे विचार ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. शरकत वॉर मेमोरियल समोर सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर त्यांनी सैनिकांना मार्गदर्शन केले. भारतीय सैन्य दलाला कर्तृत्व, नेतृत्व आणि शौर्य यांचा वैभवशाली वारसा आहे. कोणत्याही युद्धावर मिळविलेला विजय हा सैनिकांची स्फूर्ती वाढविणारा असतो. त्यामुळे येणाऱ्या पिढीला आणि लष्करात दाखल होणाऱ्या सैनिकांनाही प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article