श्रवणचे वडिल, भावाला अटक, गूढ कायम
नगरगाव येथील श्रवण बर्वेच्या खूनाचा कट उघड : तिघे गजाआड, खुनाचे कारण मात्र गुलदस्त्यातच
वाळपई : नगरगाव येथील श्र्रवण देविदास बर्वे यांच्या खुनाचा शेवटी उलगडा झाला. या खुनामागे त्यांचे वडील देविदास बर्वे व त्यांचे भाऊ उदय बर्वे यांनीच कट रचल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल रविवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण खुनाचा घटनाक्रम सविस्तरपणे मांडला. मात्र हा खून कशामुळे झाला याचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. स्वत:च्या मुलाचा व भावाचा खून करण्यासाठी वासुदेव ओझरेकर या इसमाचा वापर करण्यामागचे कारण काय? कशासाठी त्यांनी खून केला ? वासुदेव ओझरेकर यांनी या खुनासाठी सहमती कशाच्या आधारावर दाखविली? सदर खून मालमत्तेच्या स्वार्थामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला? अशा अनेक प्रŽांची उत्तरे पोलिसांना अजून साडपलेली नाहीत. अटक करण्यात आलेल्या वासुदेव ओझरेकर याला दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
तेरा एप्रिल रोजी रचला कट
पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी श्र्रवण बर्वे यांच्या खुनाचा कट रचण्यात आला. कट रचण्यात तिघांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे. ज्या दिवशी हा खून झाला त्यादिवशी श्र्रवण बर्वे यांचे वडील देविदास व भाऊ उदय हे होंडा या ठिकाणी होते. तशी माहिती देविदास बर्वे यांनी मंगळवारी सकाळी पोलिसांना दिली होती.
पहिल्याच दिवशी उघड झाला खून
श्र्रवण देविदास बर्वे यांचा खून सोमवार 14 एप्रिल रोजी मध्यरात्री घडल्याचे समजते. मंगळवारी 15 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्र्रवण यांचे वडील देविदास बर्वे हे त्यांच्यासाठी नाश्ता व जेवणाचा डबा घेऊन आल्यानंतर श्र्रवण बर्वे यांचा मृतदेह घराच्या गेटच्या समोर पडलेला आढळला होता. त्यानंतर देविदास यांनी वाळपई पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर सदर प्रकरण गेल्या चार दिवसापासून सत्तरीसह संपूर्ण गोव्यात गाजत आहे. ज्यावेळी मृतदेह अंगणात सापडला होता, त्यावेळी त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास होता. गळ्याला जखमा होत्या. दोन्ही हातावर रक्ताच्या जखमा होत्या. यामुळे त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनीच उघड झाले होते.
पहिला संशयित वासुदेव ओझरेकर
मंगळवारी सदर खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावरून चौकशी सुरू केली होती. यासाठी 18 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, त्यापैकी 15 जणांना चौकशी करुन सोडून देण्यात आले. तिघांना अधिक चौकशीसाठी पोलिसस्थानकावर बसवून ठेवण्यात आले होते. स्थानिकांनी या संदर्भात तीव्र स्वरूपाचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर वासुदेव ओझरकर यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडून देण्यात आले. ओझरकर यांना अधिक चौकशीसाठी डिचोली पोलिसस्थानावर ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून सविस्तरपणे चौकशी करण्यात आल्यानंतर श्र्रवण बर्वे यांचा खून करण्यामागे वासुदेव ओझरेकर यांचा प्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. वासुदेव ओझरेकर यांच्या सहभागाने या प्रकरणातील पहिला संशयित पोलिसांच्या गळाला सापडला.
वासुदेव ओझरेकरने फोडले पिता-पुत्राचे बिंग
वासुदेव ओझरेकर याला चौकशीसाठी अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या खुनामागे श्रवणचे वडील देविदास व त्याचा भाऊ उदय यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. ओझरेकरने सांगितले की रविवार 13 एप्रिल रोजी या संदर्भाचा कट रचविण्यात आला. श्रवणचे वडिल, भाऊ व आपण अशा तिघांची संयुक्त बैठक झाली आणि त्यात श्र्रवणचा काटा काढण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सोमवारी रात्री तिघांनी मिळून त्याचा खून केल्याचे सध्यातरी मिळालेल्या माहितीनुसार समजते.
स्थानिकांची शंका ठरली खरी
दरम्यान मंगळवारी 15 एप्रिल रोजी ज्यावेळी खुनाचा प्रकार उघडकीस आला त्याचवेळी स्थानिकांना देविदास बर्वे याच्यावर संशय होता. गेल्या तीन वर्षापासून श्रवण व त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत होते. या संदर्भाच्या तक्रारी वाळपईच्या पोलिस स्थानकावर नोंद झालेल्या आहेत. वडील व श्र्रवण यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे हा खून करण्यामागे त्यांच्या वडिलांचा समावेश असण्याची शक्मयता स्थानिकांनी व्यक्त केली होती व ती शेवटी खरी ठरली.
अंत्यसंस्कार पणजीत केल्याने संशय
बुधवारी सकाळी श्रवणच्या मृतदेहाची चिकित्सा करण्यात आल्यानंतर त्याच्यावर पणजी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांच्या मनांमध्ये शंकेची पाल चुकचुकली होती. नगरगाव या ठिकाणी त्यांच्या मालकीची जमीन असतानासुद्धा त्यांच्यावर तेथे अंत्यसंस्कार न करता दूरच्या पणजी या ठिकाणी अंतिम संस्कार का करण्यात आले? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यावरुन निर्माण झालेला संशय शेवटी खरा ठरला. ज्या वडिलांवर पोलिसांचा संशय होता, तो आणखी बळावला आणि शेवटी वडिल पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
मालमत्तेच्या वादातून खून?
प्राप्त माहितीनुसार देविदास बर्वे व उदय बर्वे हे गेल्या तीन वर्षापासून मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याला श्र्रवण हा अडथळा निर्माण करीत होता. सदर जमीन विकण्यासाठी अनेक वेळा अनेकांशी बोलणी झाली होती. मात्र श्र्रवण यांचा त्याला तीव्र विरोध होता. मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा श्रवणने अनेकवेळा वडिलांनी दिला होता. यामुळे वडील व त्यांच्यामध्ये वारंवारपणे भांडणे होत होती, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
वासुदेव ओझरेकर यांची हनुमान जयंतीच्या आठ दिवसापूर्वी देवस्थानच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. देवस्थानच्या कामांमध्ये श्र्रवण यांचा चांगल्या प्रकारचा संबंध होता असे असताना वासुदेव ओझरेकर हा श्र्रवण यांचा खून करण्यात सहभागी होऊ शकतो, याबाबतचा उलगडा अजूनही झालेला नाही. मात्र प्रथमदर्शी संशयानुसार या प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार असण्याची शक्मयता अनेकांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी मध्यरात्री वाळपई पोलिसांनी श्र्रवण यांचे वडील देविदास बर्वे यांना अटक केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वाळपईच्या सरकारी सामाजिक ऊग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की यामध्ये आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुलाला आपण कशाला मारणार. मला माझा मुलगा हवा आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.