महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्व्हरडाऊनमुळे जन्म-मृत्यू विभागावर ताण

11:21 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंगळवारी सकाळी 8.30 वाजताच विभाग केला सुरू 

Advertisement

बेळगाव : सर्व्हरडाऊनमुळे जन्म आणि मृत्यू दाखला सोमवारी मिळणे कठीण झाले. सकाळपासूनच ही समस्या भेडसावल्याने दाखले घेण्यासाठी आलेल्या जनतेला ताटकळत थांबावे लागले होते. सोमवारी बंद असल्यामुळे मंगळवारी सकाळी 8.30 वाजताच हा विभाग आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सुरू केला. त्यामुळे मंगळवारी या कामासाठी आलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी नोंद करणे महत्त्वाचे असते. नोंद केल्यानंतर काही दिवसांनी त्याची प्रत दिली जाते. मात्र सोमवारी सकाळपासूनच सर्व्हरडाऊनची समस्या सुरू होती. दुपारी हा विभाग सुरू होईल, अशी अपेक्षा असताना सर्व्हर सुरू झालेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. मंगळवारी सकाळी सर्व्हर सुरू झाल्याने लवकरच हा विभाग सुरू करण्यात आला.

Advertisement

वादावादीचे प्रसंग

जन्म-मृत्यू दाखल्याची नोंद करण्यासाठी आणि दाखले घेण्यासाठी लांबच्यालांब रांगा लागत आहेत. अनेकजण थेट त्या विभागातच शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी वादावादी होत आहे. मंगळवारी एका व्यक्तीने आरोग्याधिकाऱ्यांनाच एकेरी शब्दाने बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या व्यक्तीला चांगलेच धारेवर धरण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article