For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हस्तगत 7 कोटींची मालमत्ता वारसांना परत

11:14 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
हस्तगत 7 कोटींची मालमत्ता वारसांना परत
Advertisement

विजापूर जिल्हा पोलिसांची कार्यवाही : मागील वर्षभरात विविध गुन्ह्यांमध्ये 345 आरोपींना अटक

Advertisement

विजापूर : विजापूर जिह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 225 मालमत्ता चोरीच्या प्रकरणांमध्ये एकूण 345 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 7 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्ता हस्तगत करण्यात आल्या. या वस्तू वारसदारांना परत करण्यात जिल्हा विजापूर यशस्वी ठरले आहेत. शुक्रवारी जिल्हा पोलिसांच्या वतीने विजापूर शहरातील पोलीस परेड मैदानावर आयोजित ‘प्रॉपर्टी रिटर्न परेड’ मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली चोऱ्यांमध्ये गमावलेले सोने व इतर वस्तू वारसांना परत करण्यात आल्या.

सोने चोरी प्रकरणे

Advertisement

गेल्या एका वर्षात विजापूर जिह्यात सोने चोरीच्या 97 प्रकरणांमध्ये 152 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एकूण 5,145.02 ग्रॅम सोने व 1,723 ग्रॅम चांदीचे दागिने, एकूण  2,39,85,110 रुपये किमतीची  मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

वाहन चोरी प्रकरणे

जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल 73 दुचाकी चोरी प्रकरणांत 102 आरोपींना अटक करून 251 दुचाकी (मूल्य  1,06,72,000 रु.) जप्त करण्यात आल्या. चारचाकी वाहन चोरीच्या 14 प्रकरणांत 19 आरोपींना अटक करून 12 चारचाकी वाहने (मूल्य 1,32,41,000 रु.) जप्त करण्यात आली.  टिप्पर चोरीच्या प्रकरणांत 5 आरोपींना अटक करून 2 टिप्पर (मूल्य 19,00,000 रु.) पोलिसांनी जप्त केले आहेत.

रोख व इतर चोरी प्रकरणे

जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 19 रोख चोरीच्या प्रकरणांतून 31 आरोपींना अटक करून 1,91,89,404 रु. रोख हस्तगत करण्यात आले होते.  इतर 21 चोरीच्या प्रकरणांतून 36 आरोपींना अटक करून 12,42,250 रु. किमतीच्या एकूण 143 वस्तू हस्तगत केल्या होत्या. एकूण 7,02,29,764 रु. किमतीच्या जप्त मालमत्तांपैकी 3,46,08,100 रु. किमतीच्या मालमत्ता वारसांना परत करण्यात आल्या असून, उर्वरित 3,56,21,664 रु. किमतीच्या वस्तू न्यायालयाच्या परवानगीने लवकरच वारसांना परत करण्यात येतील, अशी माहिती एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शंकर मारिहाळ, रामनगौड हत्ती, डीवायएसपी बसवराज यलिगार, बळप्पा नंदगावी, सुनील कांबळे, तुळजाप्पा सुल्फी, एच. एस. जगदीश व विविध पोलीस ठाण्यांचे सीपीआय, पीआय, पीएसआय उपस्थित होते. पोलीस विभाग सर्व प्रकारच्या जनसेवेसाठी सदैव तत्पर आहे. जनतेने आपल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. सीसीटीव्ही असल्यास चोरी प्रकरणांचा छडा लावणे सुलभ होते. प्रत्येक घर, रस्ता, गल्ली, गावांमध्ये सीसीटीव्ही आणि वाहनांमध्ये जीपीएस उपकरण बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात लोभ व हव्यास हे मुख्य कारण असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन लक्ष्मण निंबरगी यांनी केले.

Advertisement
Tags :

.