For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या पदरी काय पडले : आदित्य ठाकरे

12:40 PM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
भाजपला निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या पदरी काय पडले   आदित्य ठाकरे
Aditya Thackeray
Advertisement

विटा प्रतिनिधी

दहा वर्षे भाजपला निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या पदरी काय पडले? मग लोकांनी त्यांना मतदान का करावे?, असा सवाल करीत भाजपला संविधान आणि लोकशाहीमध्ये बदल करायचे आहेत. पुन्हा भाजपची सत्ता आल्यास सामान्य माणूस निवडणुकीला उभा राहू शकणार नाही, अशी घणाघाती टिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

Advertisement

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसांगता सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, पै. चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अॅड. बाबासाहेब मुळीक, राजू जानकर, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. सगळीकडे चांगले वातावरण आहे. भाजप म्हणते चारसो पार, आपण त्यांना विचारले पाहिजे, कोठून येणार आहेत, चारशे जागा. दक्षिणेत सात आणि उत्तरेत आठ जागा मिळणारा पक्ष चारशे पार सांगतो आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे आहे. भाजपने ज्या हुकूमशाही वृत्तीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली, दिल्लीत त्यांच्या जागा येणार नाहीत. इंडिया आघाडीच दिल्लीत येईल. ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे, त्यांना तुम्ही निवडून देणार आहात काय? असा सवाल करीत 370 कलम काढल्यानंतर काश्मिरमध्ये काय फरक झाला. यापेक्षा काश्मिरी पंडीत पुन्हा तिकडे रहायला गेले का? हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे. त्यांना तिकडे काश्मिरमध्ये दोन उमेदवार मिळत नाहीत, ही त्यांची अवस्था आहे, अशी टिका ठाकरे यांनी केली.

Advertisement

भाजपच्या राज्यात ना शेतकरी समाधानी आहे, ना महिला, ना तरूण, ना गरीब. कोणालाच न्याय दिला नाही. शेतमालाला भाव नाही, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारला पुन्हा संधी देणार आहात काय? असा सवाल करतानाच आमचे सरकार असताना साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आम्ही महराष्ट्रात आणली. मात्र यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले. आम्ही गुजरातच्या विरोधात नाही, मात्र महाराष्ट्रातील युवकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, हे आमचे प्राधान्य आहे. माजी मंत्री विश्वजित कदम यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवताना कर्नाटकात महिलांची अहवेलना करणाऱ्या उमेदवाराला समर्थन देताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अशी टिका केली. त्यांनी पक्ष, परिवार फोडण्याचे काम केले. मात्र महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बरोबर असल्याचा दावा माजी मंत्री कदम यांनी केला.

Advertisement
Tags :

.