महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणारे ‘साक्षी ध्यान’

06:48 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडम.. जीव नुसता घुसमटतोय. काही सुचत नाही. सतत विचार विचार आणि विचार. एक विचार आला की दुसरा..तिसरा. मालिका सुरूच. विचारांना कितीही थांबविण्याचा प्रयत्न केला तरीही विचारचक्र सुरूच राहते. त्या विचारांना फार अर्थ असतो असेही नाही. मग एक प्रकारचा ताण जाणवायला लागतो. काहीवेळा डोके दुखते, खांदे दुखतात. भरकटल्यासारखेच होते. परवा सकाळी फिरायला गेले. चालता चालता विचारांच्या तंद्रीत घर कधी आले हे कळलेच नाही. घरासमोर दोन मिनिटे थांबले आणि लक्षात आले की आपण पोहचलोही. माझे मलाच आश्चर्य वाटले. रस्त्यात कुठे काही झाले असते तर? एकदम नजरेसमोर मुलं आली आणि कल्पनेनेच सर्रकन काटा आला. माझ्यातला हा बदल मला जाणवतो आहे. पण नेमके काय करावे ते सुचत नाही असे म्हणून शिवानी रडू लागली.

Advertisement

बरं..शांत हो. आपण पाहू काय करायचे ते. मॅडम पण यातून मी नक्की बाहेर पडेन ना?

Advertisement

हो अगदी नक्की बाहेर पडशील. मॅडम, मी अस्वस्थ होते कारण विचार कसलेही येत असतात. वाटेल ते. सांगायलाही कसेतरी वाटावे इतके विचित्र! किती वेळा सारे लिहून काढले, स्वत:ला समजवायचा प्रयत्न केला पण विचारांच्या प्रवाहात इतके भरकटायला होते की काही विचारू नका. मध्येच ती लिंक तुटते आणि मग एकदम झोपेतून जाग आल्यासारखे होते आणि काय हे.. आपले लक्ष कुठे आहे, आपण कृती काय करतो आहोत आणि मन कुठे भरकटते आहे.. याची तपासणी सुऊ होते. कशाचा कशाशी ताळमेळ नाही अशी तऱ्हा होते. काहीवेळा मग थकवा जाणवतो. शिवानी अगदी मोकळेपणाने आपली समस्या मांडत होती.

खरंतर विचार करणे हे आपल्या मेंदूचे कामच आहे परंतु विचारांच्या एका पाठोपाठ एक अशा अनेक फाईल्स मेंदूमध्ये ओपन होऊ लागल्या तर मात्र असा गोंधळ होऊ लागतो. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचे विचार, भविष्याचे नियोजन वा त्या संदर्भातील विचार येणे हे स्वाभाविक आहे परंतु आपण सतत भूतकाळ आणि भविष्याच्या विचारात वाहत राहिलो तर मात्र आपल्याला वर्तमानात जगणे अवघड होऊन जाते. अकारण ताण निर्माण होतो आणि जे करतो आहोत त्यातील आनंद घेता येत नाही. म्हणून विचारांच्या प्रवाहात पोहायला शिकण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. ते आपण करू शकलो तरच यशाचा किनारा गाठणे सोपे होईल.

पहा हं, आपण कोणतीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा करायला शिकतो तेव्हा ती लक्षपूर्वक करतो. त्यावेळी आपला मेंदू त्यामध्ये गुंतलेला असतो. उदा. सुऊवातीला गाडी शिकताना आपले सगळे लक्ष तिथेच असते. सराव झाला की तिथे फार लक्ष द्यावे लागत नाही. गिअर बदलणे, अॅक्सीलेटर देणे या गोष्टी पटापट केल्या जातात. कारण सराव झाल्यानंतर मेंदू ते काम आपल्या सहकाऱ्यांकडे डेलिगेट करतो अर्थात मज्जारज्जूकडे सोपवतो. कारण विचार करणे हे मानवी मेंदूचे अधिक महत्त्वाचे काम आहे. सरावाची कृती झाल्यावर तसे केले गेले नाही तर आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकू शकणार नाही. त्यामुळे ते नैसर्गिक रीतीने घडत असते. म्हणजेच कृतीची सवय झाली की ती यांत्रिकतेने घडू लागते. आपण ऑटो पायलट मोडवर राहतो. त्यामुळे कृती सुरू राहते आणि मन मात्र भूतकाळ, भविष्य यातच पळत राहते. अशावेळी प्रयत्नपूर्वक सजग रहावे लागते.

सतत विचार येऊ लागले तर मानसिक दमणूक तर होतेच आणि वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर  विचार आणि वास्तव यातले अंतरही खूप वाढू शकते आणि

वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. ‘साक्षी ध्यान’ तंत्राने मेंदूची विचारांच्या प्रवाहात वहात जाण्याची सवय बदलता येणे शक्मय आहे.

पूर्वी काही लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे श्वासाच्या स्पर्शावरती लक्ष देण्याचा सराव हा सजगता वाढवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचे आपण पाहिले होते. त्या सरावासोबतच हळूहळू मनात येणारे विचार साक्षीभावाने म्हणजेच त्या विचारांना चांगले वाईट अशी प्रतिक्रिया व्यक्त न करता न्याहाळण्याचा सराव करायचा. दररोज दहा मिनिटे शांत बसून मनामध्ये काय चालले आहे हे पहायचे. जसे आपण उत्सुकतेने एखादी गोष्ट न्याहाळतो तसे उत्सुकतेने येणारे विचार पहायचे. अगदी सुऊवातीला हे जमत नाही. काहीवेळा त्या विचार प्रवाहात गुरफटायलाही होते. तसे होत असेल तर विचारांचे काऊंटिंग करायचे. एक, दोन, तीन असे मनात येणारे विचार मोजायचे. कारण अशा पद्धतीने आपण जेव्हा  काऊंटिंग सुरू करतो ते करण्यासाठी त्या विचारापासून आपल्याला वेगळे व्हावे लागते. प्रयत्नपूर्वक हे करत राहिले तर या सरावाने विचारांची सजगता वाढते.

यातला तिसरा मार्ग वा टप्पा म्हणजे शरीराची सजगता. स्कॅनर जसा कागदावरती फिरतो तसेच मनाने बॉडी स्कॅन करायची. जणू प्रत्येक अवयवाशी आपण संवाद साधत आहोत अशा पद्धतीने शरीरावर, शरीरामध्ये जाणवणाऱ्या संवेदना पहायच्या. समजा आता कुठेतरी धडधड जाणवते आहे तर त्याचा स्वीकार करायचा. उत्सुकतेने ती कितीवेळ तशीच राहते की कमी होते आहे हे न्याहाळायचे. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ते जाणत रहायचे.

सजग कृतीच्या सरावाच्या माध्यमातूनही हे करता येते. आपल्या कृती जेव्हा सवयीच्या होतात त्यावेळी त्या बऱ्याचदा यांत्रिकतेने होत असतात. सुरुवातीच्या उदाहरणातील शिवानीसारखी अनेकांची स्थिती होते ती यामुळेच. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेकदा आपण ऑटो पायलट मोडवरती असतो. म्हणजे जे करत असतो ते यांत्रिकतेने होत असते आणि मन विचारात गुंग असते. सजग कृती करायची म्हणजे काय तर ती कृती जाणीवपूर्वक तिथेच लक्ष देत करायची. सर्व हालचाली जाणीवपूर्वक करायच्या. असा संकल्प करायचा की मी रोज एखादी कृती जाणीवपूर्वक करेन. उदा. जेवताना मी सजग राहीन. मग त्यासाठी काय करायचे तर समोर ताटात असलेले पदार्थ त्यांचा रंग, आकार हे न्याहाळायचे, समरसून त्यांचा सुगंध अनुभवायचा, घास तोंडात ठेवल्यानंतर त्याची चव, स्पर्श हे जाणायचे. थोडक्मयात सांगायचे तर पंचेंद्रियांनी तो अनुभव अगदी समरसून घ्यायचा. अशा पद्धतीने कोणतीही एक कृती जाणीवपूर्वक करायची. यामुळे आपण जे करतो आहोत त्यात रहायचा सराव होऊ लागतो. वर्तमानाचा आनंद घेता येतो. आणि विचारांचा वेग कमी होतो.

शांत बसून मनात येणारे विचार जाणणे, प्रतिक्रिया न करता ते न्याहाळणे, बॉडी स्कॅन, सजग कृती या तंत्रांच्या सरावातील सातत्याने विचार हे मनातले तरंग आहेत याचे भान येऊ लागते. Aत्त् tप्दल्gप्ts arा ऱ्दू इaम्ts याची जाणीव होऊ लागते. स्वत:ला विचारांपासून वेगळे करता येण्याचे कौशल्य विकसित झाल्याने विचारांच्या रवंथानी होणारी मानसिक दमणूक, उद्भवणारा ताण कमी होतो.

लक्ष देण्याचे कौशल्य विकसित होते. ातम्tग्न attाहूग्दह वाढते. सजगता ध्यानमध्ये ज्यावेळी आपण विचार जाणत असतो त्यावेळी प्री फ्रंटल कारटेक्स सक्रिय व्हायला मदत होत असते. श्वासाचा स्पर्श, संवेदना जाणण्याच्या सततच्या सरावाने प्री फ्रंटल कॉर्टेक्सला मेंदूतील इतर अवयवांशी जोडणारे तंतू अधिक दृढ होतात. प्री फ्रंटल कॉरटेक्समधील Aहीग्द ण्ग्हुल्त्atा र्म्दो आणि ग्हेल्त्a सक्रिय होत असल्याने भावनिक हुशारी वाढायला याची मदत होते. एकंदरच मेंदूच्या या व्यायामाचे अर्थात ‘साक्षी ध्यानाचे’ खूप फायदे आहेत. त्यामध्ये सातत्य ठेवत दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून ते अंगीकारल्यास मानसिक आरोग्य सुदृढ रहायला निश्चितच मदत होईल हे मात्र खरे!!!

-अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article