महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल- शरद पवार

04:14 PM Jun 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sharad Pawar
Advertisement

आता हुकुमशाहीच्या राजवटीचे दिवस गेले असून इतर पक्षांच्या मदतीशिवाय भाजप केंद्रात नवीन सरकार स्थापन होऊ शकले नसते. केंद्रात युतीचे सरकार आल्याने नरेंद्र मोदींची हमी आता संपली असून हे परिवर्तन मतदारांच्या बळावर शक्य झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुण्यातील पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या बैठकीत पवार बोलत होते.

Advertisement

यावेळी माध्यमांशी चर्चा करताना शरद पवारांनी, “निवडणुका आता संपल्या असून केंद्रात सरकार स्थापन झाले आहे. गेली 10 वर्षे सरकार एकच व्यक्ती होती, पण आता त्यातून त्या व्यवस्थेची सुटका झाली आहे. यावेळी, इतरांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.

Advertisement

"परिस्थिती अशी होती की बिहारचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशच्या एन चंद्राबाबू नायडू या मुख्यमंत्र्यांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता आले नसते. त्यांच्या मदतीनेच सरकार स्थापन झाले आहे, याचा अर्थ हुकुमशाहीचे ते दिवस गेले. मोदींची हमी याचा अर्थ फक्त एक व्यक्ती सरकार चालवत आहे असा होतो. मोदींची हमी आता ती संपली आहे आणि ती हमी संपवण्याची शक्ती तुमच्याकडे आहे,” असे त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती
यावेळी बोलताना शरद पवार यांनी लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होईल असे म्हटलं आहे. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्येही असाच निकाल दिसून येतील. ज्यावेळी राज्यातील सत्ता आपल्या लोकांच्या हातात येईल तेव्हा त्याचा उपयोग राज्यातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी केला जाईल. आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे," असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

Advertisement
Tags :
sharad pawarthe assembly elections
Next Article