महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधन

11:55 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गिरीश पतके यांचे प्रतिपादन : गुऊवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे बक्षीस वितरण सोहळा

Advertisement

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुऊवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्यावतीने निबंध व सामान्यज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा झाला. प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी गिरीश पतके उपस्थित होते. व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, खजिनदार मालोजी अष्टेकर उपस्थित होते. मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी गिरीश पतके यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. पतके यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा संवर्धनाची गरज आणि मराठी भाषेतून होणारा विकास याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानात कितीही बदल झाला तरी आपली भाषा व संस्कृतीही जतन केली पाहिजे. भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधन होय, असे त्यांनी यावेळी सांगितले. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुखदा पाटील व सृजन पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधांचे वाचन केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते निबंध लेखन स्पर्धेतील व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले. इंद्रजीत मोरे यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article