महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरुन रत्नागिरी, चिपळुणात तरुणांचा मृत्यू

11:36 AM Sep 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

Advertisement

शहरानजीकच्या कसोप येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. संकेत संजय देसाई (३०, रा. कसोप, रत्नागिरी ) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा २२ सप्टेंबर रोजी दुचाकीवरून कसोप येथील आपल्या घरी जात होता. त्यावेळी दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला. यात संकेतला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा करून संकेतचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

चिपळुणात वहाळ-अबीटगाव मार्गावर अपघात    

तालुक्यातील वहाळ ते अबीटगाव मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दाकीस्वार प्रदीप बाबाजी घडशी (३६, वहाळ-घडशीवाडी) या मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. 

याबाबतची फिर्याद अक्षय बाबाजी घडशी (२५, वहाळ-घडशीवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ रोजी सकाळी ८. १५ ते ८. ३० वाजण्याच्या सुमारास प्रदीप हा कामासाठी अक्षय घडशी याच्या नावे असलेली दुचाकी घेऊन वहाळ ते अबीटगाव या रस्त्याने जात होता. मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरून त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
Ratnagi accident Tarun bharat news kkan news
Next Article