पंतला दिनेश कार्तिककडून बक्षीस
वृत्तसंस्था/प्रोव्हिडन्स
सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी अंतिम सामना खेळविला जाईल. इंग्लंड बरोबरच्या सामन्यात भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत याला सामन्याती सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा बहुमान मिळाला. माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकच्या हस्ते पंतला हा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यामध्ये बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकांत 7 बात 171 धावा जमविल्या. त्यानंतर भारताच्या शिस्तबध्द आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा डाव 16.4 षटकांत 103 धावांत आटोपला. या पराभवामुळे इंग्लंडचे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.