For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेची मालवाहतूक 1.4 टक्क्यांनी वाढली

06:45 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेची मालवाहतूक 1 4 टक्क्यांनी वाढली
Advertisement

एप्रिल 2024 मधील आकडेवारी सादर : कोळसा वाहतुकीत घट होऊनही वाहतूक चांगली

Advertisement

नवी दिल्ली :

भारतीय रेल्वेने एप्रिलमध्ये मालवाहतुकीत 1.45 टक्क्यांची किंचित वाढ दर्शवली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, कोळशाच्या वाहतुकीत सुमारे 60 लाख टन घट होऊनही भारतीय रेल्वेने 1282.9 लाख टन मालाची वाहतूक केली. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एप्रिल 2024 मध्ये वाहतुकीतून मिळणारा महसूल वाढून 14075.14 कोटी रुपये झाला. वार्षिक आधारावर 1.30 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर 576.4 लाख टनांपर्यंत रेल्वेची कोळसा वाहतूक 9 टक्क्यांनी घसरली असली तरी इतर विभागांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे. कोळशाचे प्रमाण आणि रेल्वे वाहतुकीतील महसूलाचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात एप्रिलमध्ये तुलनेने कमी उष्णता जाणवली.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला थंड वातावरणामुळे एप्रिलमध्ये कोळशाच्या प्रमाणात घट झाली. वास्तविक, अतिउष्णतेअभावी थर्मल कोळशाची मागणी कमी राहिली. भारताच्या विजेच्या मागणीत उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांचा मोठा वाटा आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात विजेची मागणी वाढत आहे परंतु इतर दोन मोठ्या क्षेत्रांपेक्षा कमी आहे.

मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांच्या मते, औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील कोळशाच्या साठ्याची समाधानकारक पातळी हे देखील रेल्वे नेटवर्कवरील दबाव कमी करण्याचे एक कारण आहे.

Advertisement
Tags :

.