महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहुल गांधी यांना एकटेपणा सतावत असावा

05:58 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

असदुद्दीन ओवैसी यांची खोचक टिप्पणी

Advertisement

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा. तुमचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. यामुळे तुम्हाला एकटेपणा सतावत असावा. आम्ही कुणाला छेडत नाही, परंतु जर कुणी आम्हाला छेडत असेल तर आम्ही त्याला सोडत नाही असे ओवैसी यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले आहे.

Advertisement

काँग्रेस पक्षात लोक गुलाम होतात. तर जनता एआयएमआयएमसोबत असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.

तेलंगणा काँग्रेस प्रमुख रेवंत रेड्डी यांनी असदुद्दीन ओवैसी यांना बाहेर पडू देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हा ओवैसीला हैदारबादच्या बाहेर पडू देणार नसल्याचे म्हणत आहे. परंतु आम्हाला कुणीच रोखू शकणार नाही. हे हैदराबाद आमचे असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

रेवंत रेड्डी हे मूळचे संघाचे सदस्य आहेत. रेड्डीनी अनेक वर्षे संघात काढली आहेत. संघात जो एकदा जातो, त्याला संघ सोडत नाही. याचमुळे रेड्डीनी ओवैसीला लक्ष्य केले नसून प्रत्येक शेरवानी, टोपी परिधान करणाऱ्याला लक्ष्य केल आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या विधानसभेत बाबरी मशीद आम्हीच पाडल्याचे सांगतात असा आरोप ओवैसी यांनी केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article