महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मतमोजणीनंतर मनपा बैठकीच्या हालचाली

10:37 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थायी समितीच्या बैठकीचे वेध सुरू

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महानगरपालिकेतील  बैठका, सभा पूर्णपणे गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाल्या होत्या. मात्र मंगळवारी मतमोजणी झाली असून,आता या बैठका घेण्याचे वेध महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटाला लागले आहेत. त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहितेमुळे महानगरपालिकेतील सर्वच कामे प्रलंबित आहेत. शहरातील विविध विकास कामेही ठप्प झाली आहेत. आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांना बैठक घेवून त्यांना सूचना करणे अवघड झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि विरोधी गट नेत्यांच्या कार्यालयांनाही कुलूप लावण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वी ही कार्यालये खुली करण्यात आली आहेत. मात्र आतापर्यंत बैठकच झाली नाही. त्यामुळे आता लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेतील सभागृह अस्तित्वात येण्यास बराच विलंब लागला होता. महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर विविध निवडणुका सुरू झाल्यामुळे आचारसंहितेच्या कचाट्यात सारे अडकले होते. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिता सुरू असल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या नियुक्तीबरोबरच इतर कामकाजासाठी पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article