महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रियांका गांधींची केंद्रावर टीका

06:17 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर फार उच्च पातळीवरचे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हानी सोसावी लागत आहे. सरकारचे धोरण केवळ काही अतिश्रीमंतांचे खिसे भरणे हेच आहे. सर्वसामान्य जनतेविषयी या सरकारला काहीही आपुलकी नाही, अशी टीका त्यांनी हिंदी एक्स या सोशल मिडीयावर केली आहे.

Advertisement

देशातील तेल कंपन्यांना गेल्या सहा महिन्यांमध्ये  1.32 लाख कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर 29 टक्के कमी झाले आहेत. तरीही हे सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास तयार नाही. जनतेला यामुळे आर्थिक फटका बसला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article