महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रेमचंद यांचे लेखन सर्वसामान्यांना प्रेरणादायी

06:29 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे हिंदीचे महान साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची 144 वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून पूजन केले. प्रारंभी ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

Advertisement

हिंदी विभाग प्रमुख डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्रेमचंद यांनी समाजातील कष्टकरी, गरीब, किसान आणि सर्व वर्गांच्या लोकांची जीवनपद्धती, त्यांचे राहणीमान, त्यांच्या समस्या, व्यथा इत्यादी आपल्या साहित्यातून मांडून भारताची समकालीन परिस्थिती येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्याचे कार्य केले. यामुळे प्रेमचंद यांचे साहित्य आदर्शवादी आणि यथार्थवादी रुपाने आजही श्रेष्ठ आहे.

यावेळी हिंदी विभागातर्फे प्रेमचंद यांच्या साहित्यावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नागेश गाडीव•र यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article