कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस खाते सज्ज

12:50 PM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा हजारांहून अधिक अधिकारी-पोलीस तैनात : शहराला पोलीस छावणीचे स्वरुप; आंदोलनकर्त्यांसाठीही नियमावली

Advertisement

बेळगाव : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहा हजारहून अधिक अधिकारी व पोलिसांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावला छावणीचे स्वरुप आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सुवर्ण विधानसौध परिसरात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना आंदोलने करणार आहेत. बंदोबस्तासाठी 3,820 हून अधिक पोलीस, 146 अधिकारी यांच्याबरोबर 8 क्युआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम), राज्य राखीव दलाची 35 प्रहार पथके, गरुडा फोर्स, स्फोटकांच्या तपासणीसाठी 16 पथके तैनात करण्यात आली आहेत. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी तंबू उभारण्यात आले असून थंडीमुळे त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement

दिल्ली येथील भीषण स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर अधिवेशनाच्या काळात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्यातील वरिष्ठ अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. केवळ सुवर्ण विधानसौध परिसरातच नव्हे तर आंदोलनांच्या ठिकाणी व शहरातील इतर भागातही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 94 हून अधिक संघटनांनी आंदोलनासाठी पोलीस दलाकडे परवानगीसाठी अर्ज दिला आहे. सुवर्ण गार्डनजवळ कमी संख्येतील आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे. तर आंदोलकांची संख्या अधिक असल्यास जुन्या पी. बी. रोडवरील धारवाड नाक्याजवळ त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. आंदोलकांची संख्या आणखी वाढणार आहे.

गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी पंचमसाली समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समाजातील काही प्रमुखांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी समितीही नियुक्ती करण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना अहवाल सुपूर्द केला आहे. सरकारला ऊस उत्पादक शेतकरी, पंचमसाली आंदोलकांचा पवित्रा काय असणार, याची चिंता आहे. पंचमसाली समाजबांधवांनी यंदा 10 डिसेंबर रोजी गेल्या वर्षी झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मौन आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. आंदोलक व पोलीस यांच्यात अनेक वेळा धुमश्चक्री झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article