महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्लास्टिक : ‘शाप की वरदान’

11:15 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्लास्टिकमुक्त जनजागृतीसाठी संपूर्ण जुलै महिना राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर आचरणात

Advertisement

बेळगाव : ‘प्लास्टिक : शाप की वरदान’ आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक ही गरजेची तितकीच अपरिहार्य बाब होऊन बसली आहे. वजनाला हलके, वापरायला सोपे यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आले. परंतु, हेच प्लास्टिक भविष्यात आपल्या जीवावरही बेतणार आहे. जर प्लास्टिक वापराच्या नियमांचे पालन न करता त्याचा वापर असाच सुरू राहिला तर पुढे त्याचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना हा प्लास्टिकमुक्त जुलै म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आचरणात आणला जातो. प्लास्टिकमुक्ती खरोखरच झाली तर आपल्याला स्वच्छ रस्ते, स्वच्छ नद्या, नाले आणि समुद्र यांचे दर्शन घडणार आहे. म्हणूनच प्लास्टिकचा वापर घरी, कार्यालयात, शाळांत, सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स येथे कोठेही होऊ नये यासाठी आपण आग्रही असायला हवे.

Advertisement

प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा

प्लास्टिकमुक्त जुलै ही प्लास्टिक फ्री फाऊंडेशनची संकल्पना आहे. ज्याअंतर्गत प्लास्टिकचा वापर शक्यतो केला जाऊ नये, यावर भर देण्यात येतो. सदर मोहीम या फाऊंडेशनच्या संस्थापक रिबेका प्रिन्स-रुईझ यांनी सुरू केली. त्यांच्या या मोहिमेमध्ये आज संपूर्ण जगभरातून अब्जावधी लोक सहभागी होऊन प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. पर्यावरणाचा विचार करून या महिन्यात काही ठराविक तारखांना विशेष महत्त्व दिले आहे.

3 जुलै प्लास्टिक बॅगमुक्त दिन

त्यानुसार दि. 3 जुलै हा प्लास्टिक बॅगमुक्त दिन म्हणून आचरणात आणला जातो. आजही बाजारात जायचे म्हटल्यास आपल्या हातात प्लास्टिकच्या पिशव्याच येतात. परंतु, प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून आपण सर्वांनी सुती किंवा कापडी पिशव्या घेऊन जाणे आवश्यक आहे. चर्चा करताना किंवा कोठेही गप्पा मारताना आपण आपल्या देशात किती अस्वच्छता आहे? याबद्दल बोलत राहतो. आज आपले रस्ते स्वच्छ नाहीत. आपल्या गायींच्या पोटामध्ये प्लास्टिक जात आहे. याबाबत महानगरपालिकेने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याने कापडी पिशवी वापरण्यास सुरुवात केली तर कर्मचारीसुद्धा त्याचे अनुकरण करू शकतात. कोठेही  हॉटेलमध्ये पार्सल आणावयास जाताना आपण स्टीलचा डबा घेऊन गेल्यास हॉटेलचालकांची सोय होईल आणि आपल्यालाही प्लास्टिकच्या संपर्कात न आलेले अन्न मिळू शकेल.

राष्ट्रीय बॅग डे

याच महिन्यात 12 जुलै रोजी पुनर्वापर करता येण्याजोग्या बॅग वापरण्याचा आग्रह केला जातो. आपले भाजीविक्रेते रस्तोरस्ती भाजी विकतात. एक दृश आपल्याला नेहमी दिसते. चारचाकी वाहनातून उतरणारी एखादी स्त्राr दहा रुपयाची कोथिंबीर किंवा भाजीची जुडी आठ रुपयाला मागते. भाजीविक्रेते त्या दरामध्ये देतात. पण तीच स्त्राr किंवा एखादी व्यक्ती  कॅरीबॅग मागते, तेव्हा विक्रेताच प्लास्टिकबॅग निर्बंध आहेत, असे सांगतो. कॅरीबॅग मागणाऱ्या अशा स्त्रिया किंवा व्यक्ती पर्यावरणादिवशी मोठमोठी भाषणे देतात तेव्हा खेद वाटतो.

प्लास्टिकमुक्त पर्यावरण राखण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो!

- आरती भंडारे (पर्यावरणप्रेमी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article