महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रक्तदानासाठी लोकांनी पुढे यावे

12:16 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य संचालिका डॉ. ऊपा नाईक यांचे आवाहन

Advertisement

पणजी : राज्यात विविध आजारांसाठी व उपचार करण्याकरीता रक्ताची खूप गरज निर्माण झाली असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य खाते संचालिका डॉ. ऊपा नाईक यांनी केले आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त गोवा एड्स नियंत्रण सोसायटी आणि गोवा रक्तदान परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सचिवालय पर्वरी येथे झाला. त्यांनी सांगितले की, रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचतात, आजार बरे होतात म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अपघातात जखमी झालेल्या ऊग्णालाही रक्ताची गरज भासते. विविध प्रकारचे आजार होतात आणि ते वाढत आहेत. त्यातही रक्त लागते. अनेकदा अचानक रक्त मिळत नाही म्हणून ते साठवून ठेवावे लागते. त्यासाठी रक्तपेढी करण्यात आली असून आरोग्य खात्याच्या पेढीत रक्त जमा करण्यात येते आणि गरजेनुसार ते ऊग्णांना देण्यात येते. रक्तामुळे ऊग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो, असे डॉ. नाईक यांनी नमूद केले. रक्तदानाची जागृती वाढत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात पुढे येऊन रक्तदान करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक वर्षे रक्तदान केलेल्या युवकांचा तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या विविध संस्थाचा प्रशस्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी हे समाजकार्य सुऊ ठेवावे असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article