नदीत लोकांना मिळतात हिरे
अनेक लोक झाले कोट्याधीश
अनेकदा लोकांना लॉटरी लागते आणि ते एका दिवसात श्रीमंत होत असतात. परंतु एखाद्या नदीत हिरे वाहून येतात आणि ते लोकांना मिळत असल्याचे कधी ऐकले आहे का? भारतात एका नदीत अनेक हिरे वाहून येत असतात. काही लोकांना या नदीत हिरे मिळाले देखील आहेत.
कुठल्याही नदीत हिरे मिळणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. नदी हे हिऱ्यांचे मुख्य स्रोत नसते. अशा स्थितीत एका नदीच्या पात्रात हिरे मिळाल्याने अनेक लोक मालामाल झाले आहेत. ही नदी बुंदेलखंडच्या पन्ना जिल्ह्यात आहे. अजयगढ तालुक्यात उगम पावणाऱ्या या नदीचे नाव रुन्ज आहे.
पावसाळ्यात या नदीत पूर येण्यासोबत हिरे देखील वाहून येतात. याचमुळे या नदीच्या काठावर पावसाळ्यात लोक हिरे शोधताना दिसून येत असतात. या नदीत 2 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला 72 कॅरेटचा हिरा मिळाला होता. याची खबर फैलावतच हजारोंच्या संख्येत लोक हिरे शोधण्यासाठी या नदीच्या पात्रात पोहोचले होते.
लोकांची होणारी गर्दी पाहता आता सरकारने पाऊल उचले आहे. वन विभागाने या भागात ग्रामस्थांच्या येण्यावरच बंदी घातली आहे. तरीही येथे लोक छुप्या मार्गाने नदीच्या काठावर पोहोचतात आणि हिऱ्यांचा शोध घेत असतात.