बेळगाव-मिरज मार्गावर आजपासून पॅसेंजर रेल्वे
11:50 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे काही दिवसांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 31 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान पॅसेंजर रेल्वे धावणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. बेळगाव-मिरज पॅसेंजर सकाळी 6.10 वा. बेळगावमधून निघणार असून सकाळी 9.10 वा. मिरजला पोहोचेल. सकाळी 9.50 वा. मिरज येथून निघालेली रेल्वे दुपारी 12.50 वा. बेळगावला येईल. दुपारी 1.30 वा. बेळगावमधून निघालेली रेल्वे सायंकाळी 4.30 वा. मिरजला पोहोचेल. सायंकाळी 5.35 वा. मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 8.35 वा. बेळगावला पोहोचणार आहे. पॅसेंजरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील काळातही पॅसेंजरची मुदत वाढविण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement