पर्वरी उड्डाणपुलाचे काम तात्पुरते बंद
कामाची माहिती कोणालाच नाही : रोहन खंवटे, वाहतूक व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर काम सुऊ होणार
पणजी : पर्वरीचे आमदार व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राष्ट्रीय महामार्ग 66 वर चालू असलेल्या पर्वरी उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली आणि संबंधित यंत्रणांना विश्वासात घेतले नाही तसेच कामाची नोटीस दिली नसल्याने पुलाचे काम तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती दिली.पर्वरी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूना खणण्यात आले असून वाहने रस्त्यावऊन बाजूला घेणे चालकांना अशक्य झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून लाल सिग्नल पडल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागतात. सिग्नल सुटला तरी सर्व वाहने सुटत नाहीत आणि पुन्हा सिग्नल पडल्याने अडकून राहतात अशी परिस्थिती आहे.
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूना खोल खणण्यात आले असून रात्रीच्यावेळी त्या खड्ड्यात वाहने पडण्याचा धोका आहे. या प्रकरणी तक्रारी आल्याने आणि त्या वाढल्याने खंवटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पर्वरीतील मुख्य रस्त्याशेजारील कामांची पाहणी केली. कंत्राटदार व सरकारी यंत्रणा यांच्यात त्या कामाबाबत समन्वय नसल्याचे दिसून आले. शिवाय होणाऱ्या कामाची माहिती कोणालाच देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणून उड्डाणपुलाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. सर्वांना विश्वासात घेण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा ठरवण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी चर्चा केली जाईल. त्यानंतर पुन्हा काम सुऊ होणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.