कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईश्वर कधी भेटेल अशी तळमळ लागली पाहिजे

06:09 AM Apr 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

वरेण्यराजाने बाप्पांना विचारलं की, तुम्हाला सगुणोपासना करणारा भक्त आवडतो की, निर्गुणोपासना करणारा तपस्वी आवडतो? राजाच्या प्रश्नाचे उत्तर बाप्पांनी पुढील श्लोकात दिलेले आहे. ते श्लोक असे, यो मां मूर्तिधरं भक्त्यामद्भक्तऽ परिसेवते। स मे मान्योऽ नन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ।। 3 ।। खगणं स्ववशं कृत्वाखिलभूतहितार्थकृत् ।ध्येयमक्षरमव्यत्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ।। 4 ।। सोऽपि मामेत्यनिर्देश्यं मत्परो य उपासते। संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ।। 5 ।।

Advertisement

त्यानुसार बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे भक्तिपूर्वक त्यांच्या मूर्तीची उपासना करणारा भक्त त्यांना मान्य आहे. तसेच अनन्य होऊन, इंद्रियसमुदाय आपल्या ताब्यात घेऊन, सर्व भूतांचे हित करणारा, मत्पर होत्साता ध्यानमग्न, अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापी, कूटस्थ  निर्विकार, शाश्वत व अनिर्देश्य अशा माझी उपासना करणारा देखील मजप्रत येतो. या संसारसागरापासून त्याचाही मी उद्धार करतो.

वरील तीन श्लोकात मिळून बाप्पांनी सांगितलंय की, त्यांच्या मूर्तीची पूजा करणारे भक्त त्यांना मान्य आहेत. पुढं म्हणतात, जो माझी अनन्य भक्ती करेल तो मला प्रिय होईल. त्यांची अनन्य भक्ती करत असताना त्यानं कोणत्या गुणांचं संवर्धन करावं तेही बाप्पा सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अविनाशी, अव्यक्त अशा त्यांच्या मूळ स्वरूपचाही ते उल्लेख करतात आणि सांगतात की, माझ्या मूळ स्वरूपाची उपासना करणाऱ्याचाही मी उध्दार करतो. बाप्पांनी या तीन श्लोकात मिळून एकूणच त्यांची उपासना कशी करावी याचा मार्गदर्शक आराखडा काढून दिलाय असं म्हंटलं तरी चालेल.

प्रथम सगुण भक्तीबद्दल सांगताना ते म्हणतात, जो भक्त माझ्या मूर्तीची पूजाअर्चा करून अनन्य भावाने मला भजतो तो मला अतिशय प्रिय आहे. येथे अनन्य या शब्दाला फार महत्त्व आहे. अनन्य भक्ताला बाप्पांच्याशिवाय काही दिसतच नाही. कारण इतर कशाला अस्तित्वच नाही अशी त्याची खात्री असते पण ही खात्री सहजासहजी होत नाही कारण त्यासाठी आवश्यक ती तळमळ लागण्याची गरज आहे. तळमळ कशी आणि कधी लागते ते पुढील उदाहरणातून लक्षात येईल. समजा एका छोट्या मुलाची आई स्वयंपाक करण्यात गुंतली आहे. आई पाहिजे म्हणून मुलगा हट्ट करतोय पण आईला वेळ नसल्याने ती त्याच्यापुढे काही खेळणी टाकते. त्या खेळण्यांशी ते मूल काही वेळ खेळते मग पुन्हा हट्ट करते. आई आता काही अन्य खेळणी त्याच्यापुढे करते. मुलगा काही वेळ त्यात रमतो पण आता त्याला आईशिवाय काहीच नको असतं आणि तो आईसाठी भोकाड पसरून रडू लागतो. शेवटी त्याची कणव येऊन आई त्याला कडेवर घेते. आपण त्या लहान बाळाच्याच भूमिकेत आहोत. आपल्याला आईस्वरूप ईश्वर हवा असतो पण त्याचबरोबर इतर संसारिक गोष्टींचीही आवड असते, हे जाणून ईश्वर आपल्याला आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र, धनदौलत, मानमरातब इत्यादि गोष्टी बहाल करतो आणि आपण त्यात रमतो. ईश्वरही म्हणतो ठीक आहे,

अजून हे मडकं कच्चच आहे पण जर त्याच्या कृपेने, जर आपल्याला जाणीव झाली की, हे सर्व मिथ्या असून केवळ ईश्वर खरा आहे म्हणून त्याची प्राप्ती हेच जीवनाचं खरं ध्येय आहे, तर मात्र आपल्याला ईश्वर प्राप्तीची तळमळ लागते. ज्याप्रमाणे बालकाला खेळण्यांचा कंटाळा येऊन त्यानं ती बाजूला सारली पण अजून आई मिळाली नव्हती म्हणून तळमळीने त्याने भोकाड पसरले आणि आईने कडेवर घेतल्यावरच ते गप्प बसले, त्याप्रमाणे आपल्याला संसार मिथ्या आहे हे कळल्यावरही त्यात न रमता ईश्वर कधी भेटेल अशी तळमळ लागली तर ईश्वराशी आपली गाठ पडते.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article