For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता प्रत्येक मोबाईलमध्ये सायबर सिक्युरिटी अॅप

06:22 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आता प्रत्येक मोबाईलमध्ये सायबर सिक्युरिटी अॅप
Advertisement

सरकारकडून कंपन्यांना 90 दिवसांची मुदत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आता प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सायबर सिक्युरिटी अॅप ‘संचार साथी’ प्री-इंस्टॉल केलेले (प्रथम डाउनलोड केलेले) असेल. केंद्र सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना सरकारी सायबर सेफ्टी अॅप्स स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करून ते विकण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

सरकारी वृत्तसंस्थेनुसार, या आदेशात अॅपल, सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमी सारख्या मोबाइल कंपन्यांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हे अॅप जुन्या फोनवर सॉफ्टवेअर अपडेटद्वारे इन्स्टॉल केले जाईल. तथापि, हा आदेश निवडक कंपन्यांना खाजगीरित्या पाठवण्यात आला आहे. यामागील सरकारचा हेतू सायबर फसवणूक, बनावट आयएमईआय नंबर आणि फोन चोरीला जाण्यापासून रोखणे आहे. संचारसाथी अॅपद्वारे आतापर्यंत 7 लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

संचार साथी अॅप काय आहे

संचार साथी अॅप हे सरकारने तयार केलेले सायबर सुरक्षा साधन आहे, जे 17 जानेवारी 2025 रोजी लाँच करण्यात आले. सध्या ते अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरवर स्वेच्छेने डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, परंतु आता ते नवीन फोनमध्ये आवश्यक असेल. ते आयएमईआय नंबर तपासून चोरीला गेलेले किंवा बनावट फोन ब्लॉक करेल.

Advertisement
Tags :

.