शहरांतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष
रस्त्यांची दुर्दशा; शहरवासियांचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास
बेळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहरात महत्त्वाच्या रहदारी रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे शहरवासियांना खाच-खळग्यांच्या रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आली असली तरी रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे हीच का स्मार्ट सिटी, असा प्रश्न शहरवासियांतून उपस्थित केला जात आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात आली असली तरी बाजारपेठेतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साचत आहे. अशा खड्डेमय रस्त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नरगुंदकर भावे चौकातील रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचत आहे.